राज्यातील लाॅकडाऊनमध्ये शिथिलता येणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यात कॅबिनेटने लाॅकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नाही. तसेच बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी 48 तास कोरोना टेस्टचे प्रमाणपत्र आवश्यक होत. आता या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री यांनी सांगितलं.

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, देशाच्या तुलनेत राज्याचा रूग्णवाढीचा दर कमी आहे. राज्यातील एकूण 92 टक्के रुग्ण संख्या केवळ दहा जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर आणि मेट्रो सिटीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. उर्वरित 26 जिल्ह्यात केवळ 8 टक्के रूग्ण आहेत.

राज्यात बऱ्यापैकी लसीकरण झालं आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता दिली जाईल आणि लोकल ट्रेनही सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येतील अशी चर्चा होती. मात्र, कॅबिनेटने निर्बंधात कोणतीही शिथिलता दिली नसल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्यात दररोज 7 ते 9 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे निर्बंधात शिथिलता देण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Comment