शहरातील रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा -पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद | शासन अनुदानीत शहरी सडक योजनअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या 152 कोटी व 100 कोटी निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांची कामे मे अखेर पूर्ण करावीत, असे निर्देशित करुन शहरातील विविध विकास योजनांची अंमजबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महानगरपालिकेच्या विकास कामांच्या … Read more

घाटीत आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने बळी

औरंगाबाद | घाटी रुग्णालयात आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत ११९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे घाटी रुग्णालयाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा एकीकडे वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी दहा रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला … Read more

महापालिकेची नोकरभरती लांबणीवर, सेवाभरती नियमांत सरकारने काढल्या त्रुटी

औरंगाबाद | राज्य सरकारने औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांचे आकृतीबंध मंजूर केले आहेत, पण सेवाभरती नियम मंजूर करताना राज्यातील सर्व महापालिकांमधील सर्व पदांसाठीची पात्रता सारखी असावी, असा निकष नगरविकास विभागाने ठरवला आहे. त्यादृष्टीने एकत्रित सेवाभरती नियमांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेत आकृतीबंधाचे भिजत घोंगडे होते. पाच वर्षांपासून आकृतीबंधाच्या प्रस्तावावर काथ्याकुट केला जात होता. … Read more

जि.प. शिक्षकांची 4 कोटींची देयके निधीअभावी धूळखात, देयके कालबाह्य होण्याची शिक्षकांमध्ये भीती

औरंगाबाद | तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची 4 कोटींची देयके निधी अभावी धूळखात पडून असून ही देयके न मिळाल्यास देयके कालबाह्य होण्याची भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेवर सुमारे 1250 शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी दोनशे ते अडीशे शिक्षक- शिक्षिका यांचे सन 2019 पासूनचे मेडिकल परिपूर्तीचे, अर्जित रजा, दीर्घ मुदतीच्या आजारी रजा, वेतन तफावत फरक … Read more

महापालिकेचा निष्काळजीपणा ट्रकचालकाला भोवला; दुभाजकाला धडकून ट्रक उलटला…

औरंगाबाद | सिल्लोडहून पुण्याला मका घेऊन जाणारा ट्रक गुरुवारी (ता.२५) पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील जळगाव रस्त्यावरील चौकातील वोक्खार्ड दुभाजकाला धडकला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे व मकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एका बाजूने जाणाऱ्या रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. महापालिकेतर्फे या चौकात पोलचे काम करण्यात येत आहे. यासाठी रस्त्यावर … Read more

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठक

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व यंत्रणांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यातील वाढीव रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज राहावे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे, जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि अंशतः … Read more

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एकाच बेडवर तीन रुग्ण; बेडअभावी रुग्णांना झोपावे लागते फरशीवर

औरंगाबाद | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट केले आहे. श्वेता महाले यांनी फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं … Read more

दिलासादायक ! ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत, मनपा प्रशासकांची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती…

औरंगाबाद | शहरातील ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज येणारी रुग्णसंख्या पाहून आरोग्य विभागाचेही धाबे दणाणले आहे. परंतु दुसरीकडे दिलासादायक बाब समोर आली आहे. शहरातील ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठलेही लक्षणे नसल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण … Read more

केवळ इंश्युरन्स मिळविण्यासाठी लक्षणे नसलेलेही रूग्णालयात, तपासणीसाठी आता समिती गठीत

औरंगाबाद | शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना काही रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केवळ इंश्युरन्स मिळविण्यासाठी लक्षणे नसतानाही रूग्णालयात भरती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकाराने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रूग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला. … Read more

जलवाहिनी हलवण्यासाठी सव्वा कोटीची तरतूद; निविदा प्रक्रियेद्वारे होणार जलवाहिनी स्थलांतराचे काम

औरंगाबाद | शहराची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. या कामात जलवाहिनींचा अडथळा येत असल्यामुळे त्या स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. शहराची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. या कामात जलवाहिनींचा अडथळा येत असल्यामुळे त्या … Read more