एमपीएससी परीक्षा; दोन कोरोनाबाधितांनी दिली परीक्षा, १९८३ परीक्षार्थींची परीक्षेकडे पाठ

औरंगाबाद | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आज २७ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात आली. यावेळी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियम पाळून एमपीएससी परीक्षा घेण्यात आली. एमपीएससी परीक्षेला एकूण ४ हजार २७० परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर तब्बल १ हजार ९८३ परीक्षार्थींनी पाठ फिरवली. … Read more

जि.प. सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला मंजुरी

औरंगाबाद | जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थ समितीचे सभापती किशोर गलांडे यांनी हा अर्थसंकल्प आज सादर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्वसाधारण सभा ऑनलाइन पध्दतीने अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाचे 2020 आणि 2021 चे सुधारित आणि 2021, 2022 च्या मूळ अर्थसंकल्पीय … Read more

औरंगाबाद शहरात ३७ केंद्रांवर महापालिकेकडून लसीकरण अभियान

औरंगाबाद | राज्य सरकारच्या निर्देशानुसार ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना एक एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाची तयारी महापालिकेने केली असून शहरात ३७ केंद्रे यासाठी तयार केले जाणार आहेत. लस घेण्यासाठी येताना नागरिकांना मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड या पैकी एक पुरावा सादर करावा लागणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी … Read more

दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच एप्रिल- मे महिन्यांतच होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

औरंगाबाद | इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे 10 वी आणि 12 वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार … Read more

महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला, सरकारकडून आज दहा हजार लसींचे डोस मिळण्याची शक्यता

औरंगाबाद | महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला आहे. पालिका आता नवीन साठ्याच्या प्रतीक्षेत आहे. आज दहा हजार लशींचे डोस प्राप्त होतील, असे मानले जात आहे. सरकारच्या निर्देशानुसार शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणीची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ८५ हजार व्यक्तींचे लसीकरण महापालिकेच्या माध्यमातून झाले आहे. सरकारकडून महापालिकेला लस पुरविली जाते. पालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्रे … Read more

यंदा होळी सणावर कोरोनाचे सावट, साखर गाठींच्या विक्रीवर होणार परिणाम…

औरंगाबाद | होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत आहे. यंदा संपूर्ण राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गाठींच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शहरातील दुकाने सध्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गाठ्यांनी सजली आहेत. होळीपूजन गाठीशिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधूमंडळी वरास गाठीची भेट देतात. शिवाय, शेजाऱ्यांना, आप्तांनाही … Read more

नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवांनाच परवानगी

औरंगाबाद | कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ५ यावेळेत बाहेर निघण्यास बंदी आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. मात्र या काळात नियम मोडणाऱ्या अनेक नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले … Read more

जि.प.च्या भूजल सर्वेक्षणाची कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प, वैज्ञानिकच नसल्याने टंचाईग्रस्त गावांची पंचाईत

औरंगाबाद | जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात वैज्ञानिकांची तीन पदे मंजूर असून त्यापैकी एक पद भरण्यात आले आहे. तेसुद्धा वैद्यकीय रजेवर गेल्याने भूजल सर्वेक्षणाची कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक गावांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी सध्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे भूवैज्ञानिकच नसल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची पंचाईत … Read more

‘लॉकडाऊन‘मध्येही होणार विद्यापीठ परीक्षा, २६, ३०, ३१ व १ एप्रिल रोजीचे विद्यापीठाचे पेपर ठरल्यावेळीच

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु आहेत, बीड जिल्हयात २६ मार्च ते ४ एप्रिल ‘लॉकडाऊन‘ आहे तथापि या काळातील सर्व पेपर संबधित महाविद्यालयात होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पदवी अव्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यासक्रमांच्या … Read more

रात्रीची संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची कारवाई…

औरंगाबाद | शहरात रात्री आठनंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी वाहने थांबवून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाई करत दंड वसूल केला. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी रात्री आठनंतर विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात … Read more