औरंगाबाद शहरात ३७ केंद्रांवर महापालिकेकडून लसीकरण अभियान

औरंगाबाद | राज्य सरकारच्या निर्देशानुसार ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना एक एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाची तयारी महापालिकेने केली असून शहरात ३७ केंद्रे यासाठी तयार केले जाणार आहेत. लस घेण्यासाठी येताना नागरिकांना मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड या पैकी एक पुरावा सादर करावा लागणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी … Read more

आरटीईची थकीत रक्कम द्या; अन्यथा आंदोलन करू, इंग्रजी शाळा संघटनेचा इशारा

औरंगाबाद | आरटीई कायद्याअंतर्गत राज्यातील सर्व इंग्रजी शाळांनी गरीब व वंचित गटातील पालकांच्या पाल्यास वर्ष २०१२ -१३ पासून प्रतिवर्षी २५ टक्के मोफत प्रवेश दिलेले आहेत. त्यांची प्रतिपूर्तीची रक्कम केंद्र व राज्य सरकारने वर्षातून दोन टप्यात देणे बंधनकारक असताना तीन-चार वर्षांपासून दिलेली नाही जवळपास ५०० कोटीपेक्षा अधिक रक्कम थकित आहे. शासनाने केवळ ५० कोटींची तरतूद करून … Read more

नागरिकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी साधला फेसबूक लाइव्हद्वारे संवाद

औरंगाबाद | मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. औरंगाबाद जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे, ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनावर कसा अटकाव आणता येईल, काय उपाययोजना कराव्या लागतील, नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे, अशा अनेक मुद्द्यावर आज फेसबूक लाइव्हमध्ये माहिती दिली. … Read more

यंदा होळी सणावर कोरोनाचे सावट, साखर गाठींच्या विक्रीवर होणार परिणाम…

औरंगाबाद | होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत आहे. यंदा संपूर्ण राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गाठींच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शहरातील दुकाने सध्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गाठ्यांनी सजली आहेत. होळीपूजन गाठीशिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधूमंडळी वरास गाठीची भेट देतात. शिवाय, शेजाऱ्यांना, आप्तांनाही … Read more

नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवांनाच परवानगी

औरंगाबाद | कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ५ यावेळेत बाहेर निघण्यास बंदी आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. मात्र या काळात नियम मोडणाऱ्या अनेक नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले … Read more

जि.प.च्या भूजल सर्वेक्षणाची कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प, वैज्ञानिकच नसल्याने टंचाईग्रस्त गावांची पंचाईत

औरंगाबाद | जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात वैज्ञानिकांची तीन पदे मंजूर असून त्यापैकी एक पद भरण्यात आले आहे. तेसुद्धा वैद्यकीय रजेवर गेल्याने भूजल सर्वेक्षणाची कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक गावांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी सध्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे भूवैज्ञानिकच नसल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची पंचाईत … Read more

रात्रीची संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची कारवाई…

औरंगाबाद | शहरात रात्री आठनंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी वाहने थांबवून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाई करत दंड वसूल केला. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी रात्री आठनंतर विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात … Read more

शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करा, केंद्रीय अवर सचिवांनी पत्राद्वारे दिले प्रशासनाला आदेश

औरंगाबाद | केंद्र व राज्य सरकारने शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने या निधीतून शहरात निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय अवर सचिवांनी प्रशासनाला दिले आहे. औरंगाबाद शहरातील नागरिक सुरज अजमेरा यांनी शासन निधीतून पालिकेमार्फंत शहरात … Read more

जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाऊनचे संकेत, आता पर्यंत टाळले,वेळ आली तर उद्योगाबाबत विचार करू

औरंगाबाद | आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधत जिल्ह्यात अंशतःलॉक डाऊन लावून देखील नागरिक कारणे दाखवून रस्त्यावर फिरत आहेत. नागरिकांनी मदत करावी आता पर्यन्त प्रशासनाने लॉकडाऊन टाळले मात्र वेळ आलीच तर उद्योगा बाबत विचार केला जाईल.असे म्हणत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबादेत लॉकडाऊनचे संकेत तर दिले नाही ना अशी चर्चा सुरू आहे. आज … Read more

दिलासादायक…! घाटी रुग्णालयातील २५ रुग्णांना पाठविले घरी

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकीकडे ७२ हजार पार गेला आहे. त्यामुळे चिंता जरी वाढली असली तरी दुसरीकडे बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने दिलासा मिळाला आहे.  घाटी रुग्णालयात आज पुन्हा २५ रुग्णांना सुट्टी देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. घाटीत आज आयसीएमआरच्या नवीन नियमानुसार २५ … Read more