औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर

vidhan bhavan

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचे ठराव विधानसभेत एकमुखाने संमत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा ठराव विधानसभेत मांडला. त्यानुसार औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार आता या शहरांच्या नामकरणाचा प्रस्ताव दोन्ही सभागृहाकडून केंद्र … Read more

औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शहराच्या नामांतर बाबत कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झालेच तर चांगलेच आहे. आता राजकारण करणारे खासदार खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना मत विभाजन साठी उभे केले होते जलील हे खैरेचे चेले असल्याचा आरोप या वेळी जाधव यांनी केला. कन्नड चे माजी आमदार … Read more

हा तर नामांतराचे राजकारण करणाऱ्यांचा ढोंगीपणा ; बाळासाहेब थोरातांची शिवसेना – भाजपवर सडकून टीका

Balasaheb thorat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस मध्ये कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवरच टीकेचा बाण सोडला आहे. आणि भाजपला देखील खडेबोल सुनावलं आहे. मागील 5 वर्षे सत्तेत असूनही औरंगाबाद नामांतरावर गप्प असणारा भाजप आज त्यावर राजकारण करत आहे. हा … Read more

औरंगजेबच्या प्रेमात कोणी पडू नये ; संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावले

sanjay raut balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत असून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा घाट शिवसेनेकडून घातला जात आहे. दरम्यान कॉँग्रेसने याबाबत विरोध दर्शविल्यानंतर संजय राऊत यांनी सामनातील रोखठोख सदरातून कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी विचारले असता संजय राऊत यांनी आपली भूमीका स्पष्ट केली. औरंगाबादचे नामकरण राजकारणाचा नव्हे अस्मितेचा विषय अस राऊत … Read more

औरंगजेब नक्की कोणाला प्रिय ?? ; रोखठोक मधून राऊतांचा काँग्रेसवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणासाठी प्रयत्न सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने यासाठी प्रचंड प्रमाणात विरोध दर्शविला आहे. यावरूनच महाविकास आघाडीत ठिणगी पडली असून आज सामनातील रोखठोख या सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. हिंदुस्थानची घटना ‘सेक्युलर’ आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, … Read more

औरंगाबादचे नामांतर ही शिवसेनेची भूमिका, सरकारची नाही – प्रफुल्ल पटेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडली आहे. औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्यास शिवसेने कडून हालचाली सुरू असतानाच काँग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नामकरणास विरोध करत शिवसेनेला ठणकावले आहे. त्यामुळं आघाडीत दोन गट पडले असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते प्रफु्ल्ल … Read more

राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय मी घेतला असता- उदयनराजे

Udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यभर औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा घाट सुरू असतानाच सत्तेतील मित्रपक्ष कॉंग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध केला आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडीतच ठिणगी पडली असून विरोधी पक्ष भाजप सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले याना या मुद्द्यावरून विचारले … Read more

नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडली आहे. औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्यास शिवसेने कडून हालचाली सुरू असतानाच काँग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नामकरणास विरोध करत शिवसेनेला ठणकावले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा … Read more

संभाजीनगर हे संभाजीनगरच आहे आणि राहणार – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संभाजीनगर हे संभाजीनगरच आहे आणि राहणार. त्यामध्ये काही मतभेद नाही. औरंगाबद विमानतळाचे नाव सुद्धा धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज करण्यात यावे. असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. नाशिकचे माजी आमदार वसंत गिते व भाजपचे पदाधिकारी सुनील बागुल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विविध … Read more

औरंगाबाद की संभाजीनगर ?? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका ; म्हणाले की …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. औरंगाबादच्या नामकरण संभाजीनगर करण्याला शिवसेना आग्रही असताना काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले, राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम … Read more