मार्चअखेरीस महापालिकेची १३६ कोटींची वसुली

aurangabad

औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीला महापालिकेस गतवर्षी प्रमाणे फटका बसला आहे. वर्षभरात केवळ २२.९९ टक्के वसुली झाली असून, १३६ कोटी ८२ लाख ७८ हजार ३०५ रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. कोरोना संसर्गामुळे गतवर्षी महापालिकेला कर वसुलीत मोठा फटका बसला होता. यंदाही दिवाळीपर्यंत परिस्थिती नाजूकच होती. दिवाळीच्यानंतर कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यामुळे पालिकेने … Read more

महापालिकेच्या कर वसुलीत साडेसोळा कोटींची घट

aurangabad maha

औरंगाबाद : मालमत्ता कर वसुलीत गतवर्षीच्या तुलनेत महापालिकेला आतापर्यंत साडेसोळा कोटींची घट झाली आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत फक्त वीस टक्के वसुली झाली असल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे महपालिका तोट्यात आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत … Read more

महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला, सरकारकडून आज दहा हजार लसींचे डोस मिळण्याची शक्यता

औरंगाबाद | महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला आहे. पालिका आता नवीन साठ्याच्या प्रतीक्षेत आहे. आज दहा हजार लशींचे डोस प्राप्त होतील, असे मानले जात आहे. सरकारच्या निर्देशानुसार शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणीची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ८५ हजार व्यक्तींचे लसीकरण महापालिकेच्या माध्यमातून झाले आहे. सरकारकडून महापालिकेला लस पुरविली जाते. पालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्रे … Read more

नागरिकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी साधला फेसबूक लाइव्हद्वारे संवाद

औरंगाबाद | मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. औरंगाबाद जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे, ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनावर कसा अटकाव आणता येईल, काय उपाययोजना कराव्या लागतील, नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे, अशा अनेक मुद्द्यावर आज फेसबूक लाइव्हमध्ये माहिती दिली. … Read more

यंदा होळी सणावर कोरोनाचे सावट, साखर गाठींच्या विक्रीवर होणार परिणाम…

औरंगाबाद | होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत आहे. यंदा संपूर्ण राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गाठींच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शहरातील दुकाने सध्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गाठ्यांनी सजली आहेत. होळीपूजन गाठीशिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधूमंडळी वरास गाठीची भेट देतात. शिवाय, शेजाऱ्यांना, आप्तांनाही … Read more

‘लॉकडाऊन‘मध्येही होणार विद्यापीठ परीक्षा, २६, ३०, ३१ व १ एप्रिल रोजीचे विद्यापीठाचे पेपर ठरल्यावेळीच

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु आहेत, बीड जिल्हयात २६ मार्च ते ४ एप्रिल ‘लॉकडाऊन‘ आहे तथापि या काळातील सर्व पेपर संबधित महाविद्यालयात होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पदवी अव्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यासक्रमांच्या … Read more

शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करा, केंद्रीय अवर सचिवांनी पत्राद्वारे दिले प्रशासनाला आदेश

औरंगाबाद | केंद्र व राज्य सरकारने शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने या निधीतून शहरात निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय अवर सचिवांनी प्रशासनाला दिले आहे. औरंगाबाद शहरातील नागरिक सुरज अजमेरा यांनी शासन निधीतून पालिकेमार्फंत शहरात … Read more

महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना घ्यावी लागणार काळजी

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्यातून राजस्थान मधील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील  आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, उत्तर पश्चिम रेल्वेने एका पत्राद्वारे सांगितले असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. राजस्थानमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राजस्थान राज्यात जाताना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक केले आहे. कोणत्याही … Read more

दहावी- बारावीच्या विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा देऊ द्या, हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने केली बोर्डाकडे विनंती

औरंगाबाद | दहावी- बारावीच्या परीक्षेत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनीना बुरखा किंवा स्कार्फ घालून परीक्षा देण्याची अनुमती द्यावी, यासह आदी मागण्यांसाठी हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ औरंगाबाद  विभागीय सचिव  सुगता पुन्ने यांची भेट घेतली. हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या वतीने बोर्डाच्या सचिव पुन्ने यांच्याशी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा … Read more

शहरातील रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा -पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद | शासन अनुदानीत शहरी सडक योजनअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या 152 कोटी व 100 कोटी निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांची कामे मे अखेर पूर्ण करावीत, असे निर्देशित करुन शहरातील विविध विकास योजनांची अंमजबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महानगरपालिकेच्या विकास कामांच्या … Read more