अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर … Read more

अनिल गोटेंचा ईव्हीएमच्या गाडयांना पहारा; आपल्या वाहनात रात्रभर ठिय्या

अनिल गोटे मात्र मतदान पार पडल्यानंतरही एका वेगळ्याच कामात व्यस्त होते. मागील काही निवडणुकांपासून ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला जात असल्याने त्यामध्ये काही फेरफार होतो की काय म्हणून गोटे हे चक्क या गाड्यांच्या बाहेर आपल्या वाहनात ठिय्या मांडून होते. पहाटे तीन वाजता ज्या ठिकाणी या मशीन ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी गोटेंनी ठिय्या मांडला होता

हसन मुश्रीफांनी निकाला आधीच उधळला गुलाल !

विधानसभा निवडणुकीचं मतदान सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. मतदानानंतर आता सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलेलं असताना पुण्यासह राज्यात काही उमेदवारांनी मतदान संपल्यानंतर फटाके फोडून जल्लोष केला. निकाला तीन दिवस बाकी असतानाच उमेदवारांनी फटाके फोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज्यात 55 टक्के मतदान, शहरी भागात मतदान घटले

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५५ टक्के मतदान झालंय. ग्रामीण भागात अधिक मतदानाची नोंद झालीये. तर शहरी भागात मात्र मतदान कमीच झालं.

मतदान केंद्रावर ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्याचा राडा; ईव्हीएमवर शाई फेकत दिल्या घोषणा

राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र मतदान करण्यासाठी अवघा एक तास उरला असताना ठाण्यातील एका मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमवर शाई फेकण्याची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एक कार्यकर्ता मतदानासाठी मतदान केंद्रावर आला असता त्याने निवडणूक कर्मचाऱ्यांजवळील शाईची बाटली हिसकावली आणि ईव्हीएमवर शाई फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. सुनील खांबे असे या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. खांबे यांनी शाई फेकल्यानंतर ‘ईव्हीएम मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या. पोलिसांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतले.

हो, फडणवीस पुन्हा येणार..!! महायुतीला मिळणार १८५ ते १९५ जागा

टीम हॅलो महाराष्ट्र । दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी मतदानप्रक्रिया पार पडली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा मतदानाची टक्केवारी खालावली असून ठाण्यात मतदानाच्या टक्केवारीचा निच्चांक पहायला मिळाला. विरोधकांचं निष्प्रभ असणं, ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं पक्षांतर, कलम ३७० चा निवडणूक प्रचारासाठी केलेला वापर, कार्यक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिमा ठसवण्यात देवेंद्र फडणवीसांना आलेलं यश … Read more

परभणी जिल्ह्यात दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदान, गोदाकाठच्या ७ गावांचा मतदानावर बहिष्कार कायम

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदान संथ गतीने चालू असुन दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ५२.८६ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ पाथरी मतदारसंघात ४९.३५ टक्के तर गंगाखेड आणि परभणी विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ४३.९२ आणि ४३.७४ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांचा केंद्रात येण्याचा वेग वाढेल आणि ६० ते ६५ टक्के मतदान होईल अशी अपेक्षा आहे.

राज्यात विविध ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी देखील आल्या आहेत. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला.

‘बुलेट चं उत्तर बॅलेट ने देऊया!’ – जिल्हाधिकारी गडचिरोली

नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क वाजवला आहे. जर आपल्याला गडचिरोली जिल्हा नक्षल मुक्त करायचा असेल तर मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या “बुलेट चे उत्तर बॅलेट ने देऊया! चला मतदान करूया!” असे आवाहन सिंह यांनी केलं आहे.  

भंडाऱ्यात मतदानाला सुरवात, १० लाख मतदार बजावणार हक्क

आज राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून, सकाळी सात वाजल्यापासून राज्यात सर्वत्रच मतदानाला सुरवात झाली आहे. भंडारा जिल्हातील तीन मतदार संघात १ हजार २०६ मतदार केंद्र आहेत. तर या मतदार संघात एकूण ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नागरिकांना मतदान व्यवस्थित करता यावे तसेच कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ हजार २०२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २ हजार ३७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.