‘प्रिय देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री पदी नसणार ‘! देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून चाहत्याची ‘खंत’

‘मी पुन्हा येईन’ असं देवेंद्र फडणवीस म्हणत असतानाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा अनपेक्षित निकाल लागला. आणि ‘सत्ता स्थापन करणारच’ असा आत्मविश्वास असणाऱ्या भाजपा , अर्थातच ‘महायुती’ला मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री पदावरून बिनसल्याने ‘महायुती’मधील दोन बडे पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना दोघांनी देखील एकमेकांसोबत काडीमोड घेतला. याचा परिणाम म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा लोप पावली. आता आपल्या लाडक्या माजी मुख्यमंत्र्यासाठी त्यांच्याच एका चाहत्याने पत्र लिहिले आहे. मयूर डुमणे असे पत्र लिहिणाऱ्या चाहत्याचं नाव आहे. नक्की काय आहे पत्र जरा वाचाचं.. 

‘साहेब’ काहीही करा पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा!

काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाटाघाटी सुरु आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या आक्रमक मागणीवरून शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेतला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थापन हालचालींना वेग आला. शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या सांगली जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. याभेटी दरम्यान साहेब काही करा पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच मुख्यमंत्री करा अशी भावना एका शेतकऱ्याने उद्धव यांना बोलून दाखवली.

आता कसं वाटतंय.. फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर एकच जल्लोष

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. आता कसं वाटतंय.. गोड गोड वाटतंय.. अशा घोषणा यावेळी नागरिकांनी देत एकप्रकारे निषेध आणि आनंद दोन्ही व्यक्त केला.

मला खोटं पाडल्याबद्दल फडणवीसांचं आभार; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

शिवसेनाप्रमुखांना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेनच असं वचन दिलं होतं. आता ते वचन पाळण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी माझी भूमिका ऐकली होती आणि त्यावर त्या दोघांचं एकमत होत नव्हतं. स्वतःला पक्षात अडचण येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मलाच खोटं ठरवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही ठाकरे पुढे म्हणाले. पद आणि जबाबदऱ्यांचं सम-समान वाटप हे ठरलं होतं, आणि आता हेच ते नाकारत असतील तर मी काय बोलणार असं म्हणत गोड बोलून आम्हाला नेहमी फरफटायला लावणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आज उघडकीस आला असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

शिवसेनेला आमच्याशी चर्चा नकोच होती; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. सोबत काम केलेल्या मंत्रिमंडळाचेही त्यांनी आभार मानले. शिवसेना सोबत होती असं तुम्हाला वाटलं तर त्यांचंही आभार अशी कोपरखळी फडणवीसांनी यावेळी लगावली. यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करणंही फडणवीसांनी टाळलं.

महायुतीचंच सरकार येणार – देवेंद्र फडणवीस

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हाती आले असून महायुतीला १६० जागांवर विजय मिळवणं शक्य झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नाला लोकसभेच्या जागावाटपाचा दाखला देऊन ‘फिफ्टी-फिफ्टी’ परिस्थिती राहणार असल्याचं तसेच आता समजून घ्यायची वेळ भाजपची असं सांगितल्यानंतर तोच कित्ता देवेंद्र फडणवीसांनी पुढे नेला आहे. दोन्ही पक्षांच्या मिळून काही अपेक्षा आहेत. आम्ही एकत्र बसून त्यावर निर्णय घेऊ असं सांगत मुख्यमंत्रीपदाबाबत ‘आमचं ठरलंय’ अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे

मतदान करणाऱ्यांना सरकारकडून सर्वात जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार – मुख्यमंत्री फडणवीस

मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे’ नागरिकांना आवाहन केले. तसेच ‘प्रत्येकाला सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे.’ मतदान करणाऱ्यांना सर्वात जास्त अधिकार आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं’ असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे

देवेंद्र फडणवीस सरकारने ९६ टक्के आश्वासने पूर्ण केली; ‘भाजपा’च्या लोकनीती केंद्राचा दावा

लोकनीती संशोधन केंद्राने अहवाल प्रसिद्ध करून २०१४ च्या जाहीरनाम्यातील ९६ टक्के आश्वासने पूर्ण केल्याचा दावा केला. जातसमूह आणि त्यांच्या अस्मितेचा प्रश्न सोडवतानाच विकासाचे राजकारण फडणवीस सरकारने केल्याचा युक्तिवाद ‘लोकनीती’चे संचालक आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी ‘वॉक द टॉक’ या अहवाल प्रकाशना वेळी केला.

कर्नाटक मधून जतला पाणी देणार – मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा

सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्र ही संतांची व थोर महापुरुषांची भूमी असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे जवळचे संबध आहेत.गेल्या महिन्यांपूर्वी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जत तालुक्याला पाणी देण्याबाबत एक तास चर्चा झाली. त्यानुसार महाराष्ट्रातील सीमाभागाला पाणी देण्याची कर्नाटक राज्याची तयारी आहे. यासाठी तुबची-बबलेश्र्वर योजनेतून किंवा कोट्टलगीजवळ आलेले पाणी बोर नदीत सोडून जतच्या पूर्व भागाला दिल्याने, … Read more

पालघरमध्ये निवडणुकी आधीच मोठी उलथापालथ !माजी मंत्री मनीषा निमकर यांचा भाजपात प्रवेश

शिवसेना पक्षातून पालघर मतदारसंघात हॅट्रिक साधलेल्या पालघरच्या माजी आमदार व राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जव्हार येथील प्रचारसभेत हा पक्षप्रवेश पार पडला.