अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर … Read more

‘नितेश ५० हजार मतांनी निवडून येणार ‘- नारायण राणे

विधानसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. निवडणूक निकालापूर्वी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एकीकडे उमेदवारांमध्ये निकालाची धाकधूक आहे तर, दुसरीकडे आमदारकीच्या या परीक्षेमध्ये कोण पास होणार कोण नापास होणार,हे चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे निवडून येणार असल्याचं भाकितं केलं.

प्रदीप शर्मांवर गुन्हा दाखल; निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप

माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच धमकी दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शर्मा यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विरार पूर्व चंदनसार जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.

हसन मुश्रीफांनी निकाला आधीच उधळला गुलाल !

विधानसभा निवडणुकीचं मतदान सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. मतदानानंतर आता सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलेलं असताना पुण्यासह राज्यात काही उमेदवारांनी मतदान संपल्यानंतर फटाके फोडून जल्लोष केला. निकाला तीन दिवस बाकी असतानाच उमेदवारांनी फटाके फोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज्यात 55 टक्के मतदान, शहरी भागात मतदान घटले

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५५ टक्के मतदान झालंय. ग्रामीण भागात अधिक मतदानाची नोंद झालीये. तर शहरी भागात मात्र मतदान कमीच झालं.

राज्यात विविध ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी देखील आल्या आहेत. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला.

‘बुलेट चं उत्तर बॅलेट ने देऊया!’ – जिल्हाधिकारी गडचिरोली

नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क वाजवला आहे. जर आपल्याला गडचिरोली जिल्हा नक्षल मुक्त करायचा असेल तर मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या “बुलेट चे उत्तर बॅलेट ने देऊया! चला मतदान करूया!” असे आवाहन सिंह यांनी केलं आहे.  

१०० टक्के मतदान झालं पाहिजे – मोहन भागवत

मतदानानंतर मोहन भागवत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना निवडणुकीच्या मतदानाचे महत्व समजावून सांगितले आहे. तसेच १०० टक्के मतदान हे झाले पाहिजे असं देखील आवाहन केले आहे.

कर्जत-जामखेड मध्ये भाजपचा “राम” शिल्लक राहणार नाही! – शरद पवार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची रोहित पवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,’ रोहित पवारांनी भाजपची झोप उडवली आहे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना तीन तीन वेळा या मतदार संघात यावं लागतं. तसेच मतमोजणी नंतर सर्व पत्रकार ” कर्जत जामखेड मध्ये भाजपचा राम शिल्लक राहिला नाही” अशी बातमी करणार असल्याचे म्हणत, राम शिंदेंना जोरदार टोला लगावला.  

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, जनसुराज्य खाते उघडणार? ‘भाजपा-सेने’साठी धोक्याची घंटा !

विधानसभेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वही १० जागांसाठी अत्यंत अटीतटीचे सामने आहेत. प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असताना हळूहळू कल स्पष्ट होऊ लागला आहे. त्यानुसार आठ जागा लढविणारी शिवसेना जिल्ह्यात ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे तसेच दोनच जागा लढविणाऱ्या मित्रपक्ष ‘भाजपा’च्या दृष्टीने धोक्याची घंटा वाजत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात कोरी पाटी राहिलेल्या काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाने यावेळी खाते उघडण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावून टक्कर देण्याचे ठरवले आहे. यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांनी लक्षवेधी हवा निर्माण केली आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकत अब्रू राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावली आहे.