सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित 21 हजार शेतकर्‍यांना 14 कोटींचा निधी

Satara Agriculture News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या कृषी विभागाकडून करण्यात आले होते. पंचनाम्यानंतर आता सात महिन्यानंतर शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्हयातील 21 हजार 487 शेतकऱ्यांना 14 कोटी 4 लाख 18 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. … Read more

शेतकऱ्यांच्या संसाराची होळी होत असताना इकडे नेते रंग उधळत होते; अधिवेशनात भुजबळांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तो पुरता हवालदिल झाला आहे. त्याच्या संसाराची होळी झालेली असताना इकडे नेते रंग उधळत होते. हे चालणार नाही. राज्य सरकारने तात्काळ गुजरातच्या धर्तीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातही निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान द्यावे, अशी थेट मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज विधिमंडळाच्या अधिवेशनात … Read more

नुकसान भरपाईच्या रक्कमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ; शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि … Read more

अतिवृष्टीमुळे धावली गावचा रस्ता खचला

Dhauli Village Destroyed

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील दुर्गम अशा धावली गावातील रस्ता अतिवृष्टीमुळे खचून गेला आहे. त्यामुळे वरची धावली (जुंगटी धावली) या गावांचा धावली गावाशी संपर्क तुटला असून वाहतूकही ठप्प झाली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दुर्गम अशा भागात ठिकठिकाणी दरडी कोसळत असून काही ठिकाणी रस्ता खचत … Read more

कोयना धरणात 38.48 टीएमसी पाणीसाठा ; पावसाचा जोर वाढला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे थैमान सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा, महाबळेश्वर या याठिकाणी पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. तर कोयना धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 38.48 टीएमसी इतका पाणीसाठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ … Read more

कोकणात तुफान पाऊस : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला

पुणे | राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात पूरस्थिती निर्माण होवू लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक, नदीकाठची मंदिरे, बंधारे पाण्याखाली गेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यातही मंगळवारी पहाटे पासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता शेतात पेरण्यास मोठ्या … Read more

वादळी पावसामुळे नुकसान : ढेबेवाडी परिसरातील 25 घरांवरील पत्रे उडाले

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातीळ ढेबेवाडी विभागाला बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळामुळे विभागातील सुमारे 25 घरावरील पत्रे उडून गेले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ढेबेवाडी विभागातील डोंगरावर असलेल्या कसणी, मत्रेवाडी, रूवले आदी गावाना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्याला बुधवारी … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे – मकरंद पाटील

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहात तीन तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आमदार मकरंद पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी “पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना नदी, नाले, ओढे, रस्ते यांच्या दुरुस्तीसाठी काम एक फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. एक ही दिवस वाया न घालविता सर्वांनी प्रामाणिकपणे जबाबदारीने काम … Read more

साताऱ्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 105 गावांसाठी धावले ‘नाम’ फाउंडेशन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात महाबळेश्वर तालुक्यात 22 आणि 23 जुलै रोजी पावसाने हाहाकार केला होता. यामध्ये अनेक गावांवर अस्मानी संकट कोसळले होते. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने अनेक गावांचे भुसखलन होऊन मोठे अर्थिक नुकसान झाले होते. ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या घराचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले होता. या नुकसानग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सपाटीकरण … Read more

कोकणातून उद्रेक होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेलय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पायावसाचा पश्चिम महाराष्ट्रालाही तडाका बसला आहे. ऐन हिवाळ्यात पडलेल्या या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू फळ पिकांच्या मोहोरावर परिणाम झाला असून नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून भाजप नेते निलेश … Read more