महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही, गडकरींची जोरदार टीका

नागपूर । ”महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही,” असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचं गडकरी म्हणाले. ‘नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची … Read more

महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

पिंपरी-चिंचवड । मराठा आरक्षणाबाबत महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाकडून दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मराठा आरक्षण कधी मान्यच नव्हतं. मान्य होतं, तर १५ वर्षे … Read more

‘महाभकास आघाडीला मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही’- चंद्रकांत पाटील

मुंबई । मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टाने आज तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या असून महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारला या मुद्द्यावरून घेरले आहे. मराठा समाजासाठी हा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आजच्या निर्णयाचा महाराष्ट्रावर परिणाम झाला. भाजप सरकारने मराठा आरक्षण सर्व प्रक्रिया पार करत राज्यात … Read more

कोरोना काळात ‘हा’ एकमेव धंदा ठाकरे सरकारने चालवला आहे; फडणवीसांचा गंभीर आरोप

नागपूर । कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या मुद्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे. राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. सर्व मंत्री, प्रशासन … Read more

राज्य सरकारने ‘त्या’ प्रकरणात आधीच शहाणपणा दाखवायला हवा होता- राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर । माजी मंत्री व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. पण सरकारने जनतेचे लक्ष विचलित करून सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे … Read more

गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन झालंच समजा- रामदास आठवले

मुंबई । अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याबाबत शरद पवारांनी जाहीरपणे केलेलं हे वक्तव्य पाहता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेवरून महाविकासआघाडीच्या भवितव्याशी निगडित रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक लक्षवेधी भाकीत केलं आहे. पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. पुढं तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वाद … Read more

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बदली घोटाळा करत पैसे गोळा केले; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई । महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप करतानाच या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. … Read more

‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’- राम शिंदे

मुंबई । दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातही राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न व दूध दराच्या मुद्द्यावरून राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’ हे सरकार कधीही कोसळेल, … Read more

भाजपचीचं आमच्या संपर्कात; फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार; बच्चू कडूंचा दावा

अमरावती । राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा वारंवार दावा विरोधी पक्ष भाजपमधून करण्यात येतोय. दरम्यान,महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सत्तेतील नेते सांगत असताना भाजपातील ४० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार असल्याचेही ते म्हणाले. ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. … Read more

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’- देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. आपसातील अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही” असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात बोलत होते. “आतापर्यंत देशाच्या पाठिवर असं तीन पक्षांच सरकार कधीच चाललेलं … Read more