आम्ही’पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते पण आता.. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई । देशासह संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढा देत असताना काहीजण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. लोकशाहीच्या तथाकथित गळचेपीबाबत अनेकांनी राज्यपालांना पत्र लिहिली. तर काहींनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार अस्थिर होईल आणि आम्ही ‘पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते, पण अशांच्या हाती अपयश आले आहे, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा … Read more

‘बजेट’ महाराष्ट्राचा:’लाल’परीसाठी खुशखबर! १६०० नवीन एसटी बस, बस डेपो विकासासाठी ४०० कोटींची तरतूद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठया अपेक्षा असताना एसटी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात सरकार एसटीसाठी नव्या बसेस विकत घेण्यासाठी तसेच बस डेपो … Read more

बळीराजाला दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी सुद्धा जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली होती. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, तसेच कर्जमाफी योजनेत अचूकता यावी, हा टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यामागील … Read more

धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला आमचा विरोध! मुस्लिम आरक्षणावरून फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आणण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सूतोवाच करताच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केली आहे. भारताच्या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. तसेच मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास याचा परिणाम … Read more

सोलापूरमध्ये भाजपचे थाळीनाद आंदोलन; सरकारच्या कामावर व्यक्त केली नाराजी

सोलापूर प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी भाजपने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं आहे. ठाकरे सरकारने भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांना स्थगिती देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची भाषा ठाकरे सरकारने केली होती. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला … Read more

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी २६ मार्चला मतदान; भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील १७ राज्यांमधून निवडून आलेल्या एकूण ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळं राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे सध्याचे राज्यातील राजकीय … Read more

महाविकास आघाडी लोकाभिमुख योजना राबवित आहे, त्यांचा सर्वांनी लाभ घ्या!-पालकमंत्री अमित देशमुख

लातूर प्रतिनिधी । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील सर्व नागरीकांसाठी लोकाभिमुख योजना राबवित आहे या योजनेचा लाभ सर्व सामान्यांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातंर्गत गंजगोलाई लातूर येथील शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर … Read more

मंत्री जयंत पाटील यांच्याकडून तिसरीतील श्रेयाचे कौतुक; व्हायरल हस्ताक्षराची घेतली दखल

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : सध्याच्या काळात सोशलमिडियामुळे कोणतीही दर्जेदार कलाकृती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. एखादा व्हिडीओ, फोटो किंवा इतर कलाकृती नेटकऱ्यांना आवडल्यास नेटकरी ते आवर्जून शेअर करतात. नगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कडूवस्ती येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचे सुंदर हस्ताक्षर सोशलमिडीयावर चांगलेच व्हायरल झाले. अनेकांचा श्रेयाच्या या सुंदर अक्षरावर विश्वास बसला नाही. … Read more

२०२४ ला एकत्र लढलो तर शरद पवारांच्या रूपात मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसणार- रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांची भूमिका सर्वात महत्वाची होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवारांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत राज्यातील सरकार अस्तित्वात आणलं. असं तिन्ही पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सांगत आले आहेत. सध्या राज्यात सत्तास्थापनेत यश मिळालेल्या महाविकास आघाडीने … Read more

नारीशक्तीचा बुलंद आवाज हरपला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्याताईंच्या जाण्याने नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले अशा शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. अत्याचारग्रस्त महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहातांना त्यांना बोलते करायचे काम केले, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या माध्यमातून स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांचे हक्क यासाठी सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. … Read more