जिल्ह्यातील कारखान्यांची गाळप क्षमता वाढली, पण देसाई कारखाना मुडदूस झालेल्या अवस्थेत; माजी मंत्री पाटणकरांची शंभूराज देसाईंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापण झालेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात राजकीय अड्डा व स्थानिकांची गळचेपी सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी पाटण शुगरकेन या नवीन साखर कारखान्याची निर्मिती केल्याचे प्रतिपादन माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यातील जुन्या सर्व कारखान्यांची गाळप क्षमता दहा-बारा हजार मेट्रिक टन झाली असताना मात्र देसाई … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कराड दौऱ्यापूर्वी ‘बळीराजा’ने दिला ‘हा’ थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडला दि. २४ ते २८ नोव्हेंबर कालावधीत १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी कराड स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र ऊसदरावरून … Read more

मराठा आंदोलन अजित पवारांवर पडलं भारी! अखेर बारामती दौरा करावा लागला रद्द

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. यामुळे राजकिय पुढाऱ्यांचे गावात जाणे देखील मुश्किल होऊन बसले आहे. याचा सामना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील करावा लागला आहे. आज अजित पवार हे माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजेसाठी बारामतीला जाणार होते. मात्र माळेगावात पुढाऱ्यांना गावबंदी केल्यामुळे अजित पवारांना बारामतीचा दौरा रद्द करावा लागला आहे. … Read more

शेतकऱ्यांचे 345 कोटी रुपये थकविणाऱ्या 17 साखर कारखान्यांवर कारवाई; सातारा जिल्ह्यातील ‘या’ 2 कारखान्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अवघ्या सात दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील २६ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) शेतकऱ्यांचे १८२ कोटी तर त्यापूर्वीच्या हंगामातील १६३ कोटी असे सुमारे ३४५ कोटी रुपये थकविले आहेत. आदेश देऊनही हे कारखाने शेतकऱ्यांना पैसे देण्यात चालढकल करीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी आता … Read more

साखर निर्यातीवर लादण्यात येणार निर्बंध!! शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका

sugar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारकडून कांदा निर्यात थांबवण्यात आल्यामुळे राज्यातील शेतकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान आता मोदी सरकारकडून साखर निर्यातीवर देखील निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 1 ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात भारत सरकारने साखर निर्यातीवर बंदी घालू शकते. दरवर्षी 1 ऑक्टोंबर पासून साखर हंगाम सुरू होतो आणि तो पुढील वर्षी … Read more

किसनवीर निवडणूकि विजयानंतर शशिकांत शिंदेंनी दिली महेश शिंदेंना वॉर्निंग; म्हणाले…

kisanveer sugar factory election result

सातारा । जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा निकाल लागला असून यामध्ये माजी आमदार मदनदादा भोसले यांचा राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू नितीनकाका पाटील यांनी केलाय. (Kisanveer Sugar Factory Election Result) यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीये. सातारा जिल्हा किसनवीर, यशवंतराव चव्हाण आणि शरद … Read more

पाणीपट्टीवरून स्वाभिमानी संघटनेचा दत्त इंडिया साखर कारखान्यावर राडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पूर्व परवानगीशिवाय मायनर इरिगेशन कर वसूल केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी दत्त इंडिया साखर कारखान्यावर राडा केला. कार्यकर्ते व कर्मचार्‍यांत जोरदार वादावादी झाली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारखाना कार्यस्थळावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा व इतर कार्यकर्ते दत्त इंडिया कारखान्यात मायनर इरिगेशनच्या … Read more

ईडीकडून जरंडेश्वर कारखान्याचा ताबा घेण्याची शक्यता; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया ईडीकडून पुढील काही दिवसात सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सावकारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन केल्या गेलेल्या न्यायाधिकरणाने मंगळवारी जरडेंश्वर कारखाना लिलावात विकत घेण्यासाठी दिल्या गेलेल्या 65 कोटी रुपयांच्या प्रकरणाबाबत निर्णय दिला. ईडीने … Read more

“महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंच्या पाठिमागे उभे, मुख्यमंत्र्यांनी विचार करावा”; राजू शेट्टींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजपसह अनेक संघनातील नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. दरम्यान वीजबिलाच्या मुद्दायवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे( नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकावर हल्लाबोल केला आहे. “राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार लुटारूच्या पाठिशी उभे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किती दिवस लुटारूच्या मागे उभे राहायचे याचा विचार … Read more

साखर कारखान्याच्या अध्यक्षाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण (Video)

पंढरपूर | करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली‌ आहे. या घटनेचा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे मागील हंगामातील शेतकऱ्यांची सुमारे सहा कोटी रुपयांची एफ आर पी ची रक्कम थकीत … Read more