पुलवामामध्ये पुन्हा दहशतवाद्यांचा हल्ला ! गोळीबारात काश्मिरी पंडिताचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर खोऱ्यात पुलवामामध्ये सध्या दहशतवाद्यांचे वास्तव्य वाढले आहे. दरम्यान दहशतवाद्यांनी आज पुन्हा हल्ला केला. यावेळी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार केला असून त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. संजय शर्मा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुलवामामध्ये अचन भागात राहणारे संजय शर्मा रविवारी काही कामासाठी बाजारात जात होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेले. मात्र, त्याला वाचवता आले नाही. यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली आहे. दहशतवाद्यांनी यापूर्वी शुक्रवारी रात्री देखील आसिफ अली यांच्यावर हल्ला केला होता. आसिफ अली नमाज अदा करून मशिदीतून परत येत होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना घेरले.

बिजबिहारा भागातील हसनपोरा तवेला येथे दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीचे वडील अली मोहम्मद गनई हे पोलिसात हेड कॉन्स्टेबल होते. 29 जानेवारी 2022 रोजी मशिदीबाहेर दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.