रस्त्याच्या कडेला रिक्षा लावून तरुण रिक्षा चालकाने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बदलापूर : हॅलो महाराष्ट्र – बदलापूरमध्ये एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या रिक्षा चालकाने उल्हास नदीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. गुरुनाथ म्हात्रे असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याने आपली रिक्षा रस्त्याच्या कडेला लावून थेट नदीत उडी मारली. यानंतर प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नदीतून गुरुनाथ याचा मृतदेह बाहेर काढला. मात्र या रिक्षा चालकाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकलेले नाही.

काय आहे प्रकरण?
गुरुनाथ म्हात्रे असे या मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. याच भागातील वडवली गावातील रहिवाशी होता. या रिक्षा चालकाने बदलापुरात एरंजाड पुलावरुन उल्हास नदीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

एरंजाड पुलावरुन घेतली नदीत उडी
गुरुनाथ आज सकाळी 11 वाजता बदलापूरहून बारवी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेला. यानंतर त्याने उल्हास नदीच्या पुलावर रस्त्याच्या कडेला रिक्षा लावून त्याने थेट नदीत उडी मारली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. यानंतर या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. या घटनेची माहिती माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन दलाने नदीतून बोटीच्या सहाय्याने गुरुनाथ म्हात्रे याचा मृतदेह बाहेर काढला.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट
पोलिसांनी गुरुनाथ याचा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मात्र गुरुनाथने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment