RBI ने रद्द केला या बँकेचा परवाना; महाराष्ट्रातील लाखो खातेदारांना बसणार फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सीकेपी सहकारी बँक लिमिटेडच्या ग्राहकांना धक्का देताना या बँकेचा परवाना रद्द केला आहे. मनीकंट्रोलच्या मते, यामुळे सुमारे १.२५ लाख बँक खातेदारांवर संकट उभे राहिले आहे. बॅंकेची ४८५ कोटींची एफडी देखील यामुळे अडकल्या आहेत.

२०१४ पासून आरबीआय सतत बँकेवरील बंदीची मुदत वाढवत होता.यापूर्वीही ३१ मार्च रोजीची मुदत ही ३१ मेपर्यंत वाढविण्यात आली होती, परंतु आरबीआयने त्यापूर्वीच बँकेचा परवाना रद्द केला आहे.

सीकेपी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द का झाला आहे ? मनीकंट्रोलच्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीकेपी सहकारी बँक लिमिटेडच्या नेटवर्थमध्ये घट झाल्यामुळे त्यांचा परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे.चालू नफा असूनही नेट वर्थ घटल्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

>> सीकेपी-बँकेचे मुख्यालय दादर, मुंबई येथे आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार २०१४ मध्ये बँकेचा तोटा वाढल्यामुळे तसेच त्यांच्या निव्वळ संपत्तीत मोठी घसरण झाल्यामुळे बँकेच्या व्यवहारावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर बँकेचा तोटा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.

>> गुंतवणूकदार-ठेवीदारांनी यासाठी प्रयत्नही केले. त्यांनी व्याज दरात कपातही केली होती.व्याजदर हा दोन टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला होता.

>> काही लोकांनी स्टॉकमध्ये त्यांच्या एफडीची गुंतवणूक केली होती आणि काही प्रमाणात त्याचे परिणामही दिसू लागले होते.

>> बँकेचा तोटा कमी होत होता,पण अशा परिस्थितीत आरबीआयने सीकेपी बँकेचा परवानाच रद्द करून गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment