पर्यटन राजधानीतील पर्यटनस्थळे आजपासून उघडणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पर्यटन राजधानीतील सर्व पर्यटन स्थळे आजपासून खुली करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल दिली. कोरोना प्रतिबंधक लसीचा 2 मात्रा घेतलेल्या व ऑनलाइन तिकीट बुकिंग केलेल्या पर्यटकांना पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.

शासनाने 1 फेब्रुवारीपासून पर्यटन स्थळ, नॅशनल पार्क, सफारी पार्क, स्पा, सलून बाबत 50% उपस्थितीचे आदेश जारी केले आहेत. पर्यटन स्थळांमध्ये किती प्रमाणात पर्यटकांना प्रवेश द्यावा याबाबत स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहे. 8 जानेवारीपासून पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. मात्र, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारी रोजी पर्यटनस्थळांवरील निर्बंध मागे घेण्याचे सूतोवाच केल्यानंतर शासनाने 1 फेब्रुवारी रोजी आदेश जारी केले.

जलतरण तलाव, वाटर पार्क, 50 टक्के क्षमतेने खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट, सिनेमा, नाट्यगृह 50 टक्के ग्राहक दर्शकांचा उपस्थितीत सुरू राहतील. हॉटेल्सच्या वेळा वाढविण्याबाबत जिल्‍हाधिकारी निर्णय घेणार आहेत. भजन व इतर सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम मैदान सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. विवाह सोहळा यांना 25 टक्के उपस्थिती मर्यादा असणार आहे. तसेच आता अंतयात्रेचेसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा पूर्णता हटवण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असलेली संचारबंदी उठविण्याबाबात स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहे. तसेच आठवडी बाजार भरण्याबाबत ही स्थानिक प्रशासनाच निर्णय घेणार आहे.

Leave a Comment