धक्कादायक! पालघरनंतर उत्तर प्रदेशातही दोन साधूंची हत्या, मंदिरात झोपलेल्या अवस्थेत धारदार हत्यारानं हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उत्तर प्रदेश । महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधुंची जमावाकडून झालेल्या हत्येची घटना ताजी असतांना उत्तर प्रदेशातही दोन साधुंची हत्या झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. बुलंदशहराच्या अनुपशहर भागात मंदिरात झोपलेल्या अवस्थेत २ साधुंची धारदार हत्यारानं हत्या करण्यात आली. ही हत्या गावातीलच एका नशेच्या आहारी गेलेल्या मुरारी नावाच्या तरुणानं केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केलीय. साधुंच्या हत्येनंतर परिसरात तणावाचं वातावरण तयार झालं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या भागात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

अनुपशहरच्या पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून साधु जगदीश (५५ वर्ष) आणि शेर सिंह (३५ वर्ष) राहत होते. सोमवारी सकाळी काही भाविक मंदिरात दर्शनासाठी उपस्थित झाल्यानंतर दोघं साधूंचे मृतदेह त्यांना आढळून आले. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनाठी धाडले. सोमवारी रात्री उशिरा त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. लोकांमध्ये वाढता रोष वाहून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही परिस्थितीची माहिती घेतली.

दरम्यान, १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात दोन साधुंची आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. अफवा पसरवणारे काही मॅसेजही यासाठी जबाबदार होते. यावेळी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून या प्रकरणाबाबत चर्चा करून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही केली होती. तर महाराष्ट्रातील सरकारनं या घटनेला धार्मिक रंग न देण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. मात्र, पालघरमधील घटनेवरून समाज माध्यम, राज्यापासून ते केंद्रापर्यंत विरोधक आणि माध्यमांतील चर्चेमुळं राजकारण चांगलाच तापलं होत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment