महाराष्ट्र विधानसभेचा आजचा दिवस ठरणार वादळी; पहा थेट प्रक्षेपण

Vidhansabha Live

मुंबई । महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. आजचा अधिवेशनाचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात सदर अधिवेशनात विविध मुद्द्यावरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण आपण हॅलो महाराष्ट्र च्या युट्युब चॅनेलवर पाहू शकता. इथे खाली आम्ही सदर अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण दाखवत आहोत.

विधानसभा हिवाळी अधिवेशन थेट प्रक्षेपण | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

उदयनराजे भोसलेंचा काॅलर उडवून भन्नाट डान्स; पहा Video

सातारा : नेहमीच आपल्या हटके स्टाइल साठी प्रसिद्ध असणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावरच रचलेल्या गाण्यावर कॉलर उडवून डान्स केलाय. तरूणाईच्या आग्रहाखातर खासदार उदयनराजे भोसले यांनी काही वेळासाठी तरी ‘नाद नाही राजेंचा करायचा’ या गाण्यावर ठेका धरला.

Udayanraje Bhosle | नाद नाही राजेंचा करायचा' गाण्यावर धरला ठेका | Viral

साताऱ्यातील दस्तगीर कॉलनीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता त्या कार्यक्रमात उदयनराजेंवर तयार करण्यात आले एक गाणं लावण्यात आलं मग काय उदयनराजे देखील कॉलर उडवूनया गाण्यावर नाचू लागले.

कृष्णा कारखाना निवडणूकीच्या मतमोजणी सुरू; लवकरच हातात येणार निकाल

कृष्णा कारखाना निवडणूकीच्या मतमोजणी सुरू

चोरट्यांची करामत : पाण्याची वणवण असणाऱ्या ठिकाणी पेट्रोलच्या विहीरी सापडल्या; पुणे- सोलापूर मार्गावरील घटनेने खळबळ

fight for Well

सातारा प्रतिनिधी । शुमभ बोडके

दुष्काळी भागात पाण्याची वणवण असणाऱ्या फलटण- लोणंद येथील झणझणे सासवड (ता. फलटण) येथे चक्क पेट्रोलने भरलेल्या विहीरी सापडल्या. दिवसेंन दिवस पेट्रोलच्या वाढणाऱ्या किंमतीमुळे हैराण झालेल्या चोरांनी चक्क पुणे- सोलापूर मार्गावरील पेट्रोल पाईपलाईन फोडली. सुदैवाने पेट्रोल कंपनीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला मात्र लाखो रूपयांचे पेट्रोल मुरमाड जमिनीत मुरले आहे. पेट्रोल दरवाढीचा फटका बसत असल्याने चोरांच्या या शक्कलीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई- पुणे- सोलापूर मार्गावरून हिंदुस्थान पेट्रोलियमची २२३ किलोमीटर अंतरावरून पेट्रोलची पाईपलाईन नेण्यात आली आहे. पेट्रोलच्या पाईपलाईनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठे भगदाड पाडले आहे. त्यामुळे पेट्रोल वाहून लाखो रुपयांचे हजारो लिटर पेट्रोल जमिनीत गेल्यामुळे या भागातील विहिरीही पेट्रोलनी भरल्या आहेत . जमिनीत मुरलेल्या पेट्रोलमुळे अनेक एकर शेतांतील उभ्या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. यामुळे मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे मात्र पाईपलाईन फोडल्यामुळे मोठ्या प्रमानात

सासवड येथील खडकमाळ नावाच्या शिवारात हा प्रकार झाला असून या परिसरातील १ किलोमीटर अतंरावर दुर्गंधी पसरली असल्याने या भागात नागरिकांना येण्यास मज्जाव केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून विहीरीत साठलेले पेट्रोल कंपनीकडून काढण्याचे काम चालू असून तीन दिवस गळती काढण्याचे काम चालू राहणार आहे. हजारो लीटर पेट्रोल वाया गेल्याने कंपनीचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

चोरट्यांची करामत : पाण्याची वणवण असणाऱ्या ठिकाणी पेट्रोलच्या विहीरी सापडल्या

मध्यरात्री आलेल्या “त्या” फोनमुळे पृथ्वीराज चव्हाणांचे आयुष्यच बदलून टाकले | वाढदिवस विशेष

हॅलो विधानसभा | पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव एक आदर्श व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन नेहमीच घेतलं जातं. स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री अशी चव्हाण यांची ख्याती आहे. मुख्यमंत्री पदावर असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीच आपल्या जवळच्या लोकांच्या फाईली माणुस आपल्या गटातला आहे म्हणुन सह्या करुन पुढे पाठवण्याचं काम केलं नाही. पदाचा गैरवापर स्वत; केला नाही आणि सहकार्यांनाही करु दिला नाही. यामुळे त्यांची जनसामान्यात आजही एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्याच पक्षातील, मित्र पक्षांतील लोकांनी त्यांच्यावर कुरखोड्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अकार्यक्षम ठरवलं पण तरी चव्हाण यांनी आपल्या निर्णयांतून आपल्या कामाची छाप पाडली. ते कायम काँग्रेसशीच एकनिष्ठ राहीले. आजच्या घडीला ताटातली भाजी बदलावी त्याप्रमाणे पक्ष बदलण्याचं सत्र सुरु असणार्‍या काळात पृथ्वीराज चव्हाणांसारखा सच्चा माणुस कसा काय बरं राजकारणात पडला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचं झालं असं… Prithviraj Chavan Education

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म १७ मार्च १९४७ चा. वडील आनंदराव चव्हाण पंडीत नेहरुंचे सहकारी आणि ११ वर्ष केंद्रात मंत्री. पुढे आई देखील खासदार. मात्र तरुण पृथ्वीराजचं मन काही राजकारणात नव्हतं. त्या काळात चव्हाण यांनी बी.ई. (आॅनर्स) चे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या केलिफोर्निया विद्यापिठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. आणि अभियंता म्हणुन एका मोठ्या संस्थेत नोकरी सुरु केली. भाषांच्या संगणकीकरणाविषयी चव्हाण यांनी संशोधन केलं. हे सगळं सुरु असताना १९९१ साली एकदिवस मध्यरात्रीच्या २ वाजता त्यांचा फोन खणानला. त्याकाळी काँग्रेस हायकमांडच्या एका फोनने देशाची राजकीय गणितं बदलायची. पृथ्वीराज चव्हाण यांना आलेला फोन दिल्लीवरुनच होता. राजीव गांधी बोलत होते. “पृथ्वीराज आपको कराडसे लोकसभा चुनाव लढना है। अभी जल्द जा कर चुनाव का अर्ज दर्ज करो. आपका प्रचार करणे मै खूद आऊंगा।” असं राजीव गांधींनी तिकडून सांगितलं. राजीव गांधींकडे तेव्हा एक तरुन, तडफदार नेतृत्व म्हणुन पाहिलं जात होतं. त्यांना पृथ्वीराज चव्हाणांसारख्या हुशार, अभ्यासू, आणि जनतेशी आस्था असणार्‍या नेत्यांची फळी बांधायची होती. त्याचसाठी त्यांनी चव्हाण यांची निवड केलेली. Prithviraj Chavan Education

हायकमांडचा फोन आल्यानं पृथ्वीराज चव्हाण पहाटेच पुण्याहून कराडला निघाले. उमेदवारी अर्ज भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. कसातरी गडबडीत त्यांनी अर्ज भरला. थोडा धोडका प्रचार केला. आणि ते खासदार म्हणुन निवडून आले. पुढे केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांनी जबाबदारीची कामं पाहीली. नंतर २०१० रोजी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मंध्यरात्री आलेल्या त्या एका फोनमूळे चव्हाण यांचे आयुष्यच बदलून टाकले. एक तरुण उच्चशिक्षित इंजिनिअर खासदार झाला. Prithviraj Chavan Education

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे म्हणतात ‘स्टाईल इज स्टाईल’, कमिटमेंट कायम राहणार

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

Coronavirus : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या’ गाड्या ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण

 

आम्हाला ‘हे’ आधीच माहिती होतं, शिवेंद्रराजेंची अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर प्रतिक्रीया

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आज शनिवारी मोठा राजकीय भूकंप झालाय. एकीकडे महाविकास आघाडीची टप्प्यात येऊन आज मुख्यमंत्री जाहीर होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पाहायला मिळत असतानाच, राज्यपालांनी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपत दिलीये. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडालीय.

परंतु या घटनेची पूर्व कल्पना भाजपच्या अनेक नेतेमंडळींना होती. असे संकेत मिळत आहेत. राज्यात झालेल्या सत्ताकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना
सातारा जावळी मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं कि, मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटलांनी आम्हाला विश्वास दिला होता की, काहीही झालं तरी सरकार भाजपचेच येणार आहे. आणि आता झाले असून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.

सत्ता स्थापनेवर शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया, भाजपचेच सरकार येणार हे माहित होतं

इतर महत्वाच्या बातम्या –

शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं लागेल – आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | अजित पवार यांनी आज भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

लोकांनी माझे एकले असते तर आजचा सुखद धक्का त्यांना बसला नसता असं म्हणत प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय. तसेच शरद पवार हे खरोखर पुरोगामी आहेत काय हे आता त्यांना सिद्ध करावं लागेल. आज बनलेलं सरकार हे शरद पवारांच्या संमतीशिवाय बनले आहे हे शरद पवारांना सिद्ध करावं लागेल असंही आंबेडकर यावेळी म्हणालेत.

दरम्यान तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेचा पोपट होऊ शकतो असं मी म्हणालो होतो. आज उल्लू कोण कोण बनलं असं तुम्ही विचाराल तर काँग्रेस आणि शिवसेना हे उल्लू बनले आहेत असं आंबेडकर यांनी सांगितले.

शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला नाही हे सिद्ध केलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर

इतर महत्वाच्या बातम्या –

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

 सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

लोकसभा पोटनिवडणूकीवेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सांगता सभेत यांनी मुस्लिम समुदायाला भडकवणारी आणि त्यांची निंदानालस्ती करणारी भाषा वापरल्यामुळे याचा फटका उदयनराजेंना निवडणुकीत बसला. वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाज कमालीचा दुखावला गेला होता.

निवडणूक निकालानंतर ही बातमी उदयनराजेंना समजल्यानंतर मुस्लिम समुदायाची माफी मागण्यासाठी आज पहिल्यांदाच कराडमध्ये गेले होते. विक्रम पावसकर यांना चांगलाच धडा शिकवा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. मी त्या ठिकाणी असतो तर पावसकरांना सभेतून खाली खेचलं असतं असं उदयनराजे म्हणाले. याशिवाय माझ्या प्रचारात त्यांना मी कोणताच रोल दिला नव्हता मात्र सांगता सभेत त्यांनी वादग्रस्त भाषण करून संपूर्ण कामावर विरजण घातलं असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

श्रीनिवास पाटील यांचा नावलौकिक वाढेल असं काम सातरकरांनी करावं असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मी जर गुंड, मवाली असतो तर लोकांनी मला मुलासारखं सांभाळलं नसतं. माझ्याकडून झालेल्या चुकांची मी माफी मागतो असं म्हणत अधिक चांगलं काम करण्यासाठी मला ताकद द्या असं भावनिक आवाहनही उदयनराजे यांनी यावेळी केलं.

पहा विडिओ- 

चूक ती चूकच, उदयनराजेंकडून मुस्लिम समुदायाची माफी

शरद पवारांच्य‍ा पत्रकार परिषदेतील महत्वाचे ५ मुद्दे!

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार यांनी देशाती आणि राज्यातील महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. शरद पवार यांच्या पत्रकर परिषदेतील महत्वाचे पाच मुद्दे खालीलप्रमाणे

१) पोलीसांची सुरक्षितता – आठवडाभरापूर्वी मुंबईत पोलीसांवर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. याबाबत पवार यांनी पोलीसांची सुरक्षितता एरणीवर आल्याचं म्हटलं आहे. देशातील सर्वच राज्यांत पोलिसांची अवस्था बिकट आहे. पोलीसांना ८ तासांहून अधिक काम करावे लागते. तसेच आठवड्याची सुट्टीही पोलिसांना मिळत नाही. अशा परिस्थितीत पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात. पोलीसांवर हल्ला होणं ही गांभिर्याची बाब आहे. केंद्राने यात लक्ष घालणं गरजेचं आहे. असं पवार म्हणाले.

२) अतिवृष्टीचा शेतकर्‍यांना फटका – राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असल्याचं पवार यांनी सांगितले. मी राज्यात फिरलो तेव्हा शेतकर्‍यांना विशिष्ट आर्थिल मदतीची, काही प्रमाणात कर्जमाफीची आणि बँकांकडून कर्जपूरवठा उभारण्याची गरज शेतकर्‍यांनी मला बोलावून दाखवली आे पवार म्हणाले.

३) विमा कंपण्यांचा भोंगळ कारभार – शेतकरी विमा काढतात मात्र विमा कंपण्या आपली जबाबदारी पार पाडायला तयार नाहीत. केंद्र सरकारने विमा कंपण्यांची बैठक बोलावून त्यांना तशा सुचना देणे गरजेचे आहे असे पवार यांनी म्हटलं आहे.

४) अयोध्या निकाल – अयोध्या प्रकरणाचा निकाल लागणार असून तारीखही जवळपास निश्चित होत आहे. अशात शांतता व सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी आहे. बाबरी मस्जिद हल्ला झाला तेव्हा देशात जी परिस्थिती निर्माण झाली होती स्थिती येऊ नये यासाठी पवार यांनी आवाहन केले.

५) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण – राज्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखे अद्याप काही नाही. जनतेने भाजप शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. त्य‍ांनी राज्यातील स्थिती पूर्ववत करावी असं पवार म्हणालेत. शिवसेना आणि भाजप यांची युती पंचवीस वर्षांची आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार स्थापन करावं असं मत पवार य‍ांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. तसेच जनतेने आम्हाला विरोधीपक्षात बसवलं असून आम्ही विरोधीपक्षाची भुमिका योग्य पद्धतीने पार पाडू असंही पवार म्हणालेत. आपण मुख्यमंत्री होण्यास तयार होता काय असं एका पत्रकाराने विचारले असता मी चार वेळा मुख्यमंत्री राहिलो आहे. आता मला मुख्यमंत्री करा यासाठी मी कधीही आग्रही नव्हतो असं म्हणत या चर्चा म्हणजे प्रपोगंडा आहेत असे पवार म्हणाले.

घड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला ! सातार्‍यात खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, सातार्‍यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिह्यातील नवलेवाडीमध्ये मतदान केंद्रावर घड्याळासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केला आहे.

साताऱ्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदान सुरू झाल्यावर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घड्याळासमोरील बटन दाबले. मात्र व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत जात होते. हा प्रकार ग्रामस्थांच्या तिथल्या निवडणूक अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घड्याळाला मतदान केले तरी ते कमळाला जात असल्याचं मान्य केल्याचं गावकरी सांगत आहेत. त्यानंतर सदर ईव्हीएम बदलण्यात आलं आणि पुढील मतदान सुरळीत पार पडलं. मात्र, गंभीर घटनेबाबत आता पुढे निवडणूक आयोगाकडून काय कार्यवाही केली जाणार याबाबतच तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/445764886054352/