सात वर्षात आखलेल्या योजनांमुळे लाखो, करोडो लोकांना फायदा झाला ! – केंद्रीयमंत्री डॉ. भागवत कराड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परभणी

परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून भाजपा पक्षाच्या जन आशीर्वाद यात्रा आली असून आज परभणी, पाथरी, मानवत व सेलू येथे ही यात्रा पोहचली. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात व उपस्थितीत या यात्रेचे पाथरी शहरात आगमन झाले. यावेळी “पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सात वर्षात आखलेल्या योजनांमुळे लाखो करोडो लोकांना फायदा झाला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

पाथरी येथील यात्रेच्या कार्यक्रमप्रसंगी जिंतूरच्या आ. मेघना बोर्डीकर, पाथरी माजी आ. मोहन फड, भाजपा किसानसभा राज्य सचिव रंगनाथ सोळंके, भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, समीर दुधगावकर, पी.डी.पाटील, उमेश देशमुख आदी भाजपा पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळा केंद्रीय मंत्री कराड म्हणाले की, मुस्लिम महिलांसाठी तीन तलाक कायदा केल्यामुळे तर ओबीसी वर्ग २७ टक्के आरक्षण दिल्याने आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळाला आहे. विद्यार्थी अल्पसंख्यांक लोकांच्या हितांच्या अनेक योजनांमुळे सामान्य माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी साईबाबा जन्मभूमि मंदिरात जात दर्शन घेतले. भाजपच्या या जन आशीर्वाद यात्रेला मोठ्या संख्येने सामान्यांचा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेतून भाजपचे खासदार राज्य सरकारवरही हल्लाबोल करीत असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment