कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई; 25 कोटींची संपत्ती जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या ईडीच्या वतीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. नुकतीच ईडीच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. येथील प्रसिद्ध बेकायदेशीर कोळसा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अनुप माझी याच्या दोन साथीदारांची सुमारे 25 कोटी रुपयांची जंगम स्थावर मालमत्ता ईडीने कारवाई करत जप्त केली आहे. या दोन साथीदारांची नावे जयदेव मंडल आणि गुरुपाद माझी अशी आहेत.

कोळसा घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सोबतच त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी हेदेखील ईडीच्या रडारवर आले होते. ईडीकडून अनेकदा त्यांची चौकशीही करण्यात आली आहे. मनी लांड्रिंग कायद्यांतर्गत सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे या लोकांविरोधात एफाआयआर दाखल करत तपास सुरू करण्यात आला होता. गुरुपाद मांझी याने गुन्ह्यातून कमावलेले 89 कोटींहून अधिक रुपये आणि जयदेव मंडल याने 2017 ते 2020 दरम्यान अनुपमा जी च्या लोकांना 58 कोटींहून अधिक रक्कम दिली होती.

25 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

ईडीच्या विटने करण्यात आलेल्या कारवाईत या दोन आरोपींच्या 25 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या जंगम स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यापूर्वी या प्रकरणी ईडीने 56 ठिकाणी छापे टाकले होते. यासोबतच 181 कोटी रुपयांहून अधिक किमतीची जंगम स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीनं विकास मिश्रा, अशोक मिश्रा आणि गुरुपद मांझी यांनाही अटक केली आहे.

Leave a Comment