‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती तब्बू; ब्रेकअपनंतर कुणाशीच लग्न केलं नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री तब्बू वयाच्या ५२ व्या वर्षीही लाखो दिलों की धडकन आहे. या वयातही तिने फिटनेसच्या बाबतीत हयगय केलेली नाही. त्यामुळे अजूनही ती सिनेविश्वात कार्यरत आहे. अलीकडेच तिचा ‘क्रू’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्या. ज्यामध्ये तब्बूने करीना कपूर आणि क्रिती सॅनॉनसोबत मुख्य भूमिका साकारली आई. या सिनेमामुळे तब्बू जितकी चर्चेत आहे त्याहून जास्त तिच्या खाजगी आयुष्यामुळे तिची चर्चा असते. आजही तब्बू अविवाहित आहे. याबाबत तिच्या चाहत्यांना कायम प्रश्न पडत असतात. तर आज आपण एक महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

तब्बूने लग्न का केलं नाही?

अभिनेत्री तब्बूच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, आजपर्यंत तिचं नाव अनेक अभिनेते तसेच दिग्दर्शकांसोबत जोडल गेलं. पण तब्बूने लग्न न कर्णमगे एक खास नाव आहे. तब्बूचं एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअर होत. त्यांचं नातं अगदी लग्नापर्यंत न्यायचं असं ठरलं होत पण त्यांचं नातं इथपर्यंत पोहोचलंच नाही.

मात्र तब्बू त्या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यांच्या ब्रेकअपनंतर तब्बूने कुणाशीही लग्न न करण्याचा पक्का निर्धार केला. हा अभिनेता कोण होता? याबाबत जाणून घेऊ.

कुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती तब्बू?

एकेकाळी तब्बू लाईटलाईटमधील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या एक एक अदांवर प्रेक्षक जीव ओवाळून टाकायचे. दरम्यान, तब्बूचं नाव दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला आणि अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांच्यासोबत जोडलं गेलं होत. अक्किनेनी नागार्जुनसोबत तब्बूची फार घट्ट मैत्री आणि तितकीच जवळीक होती. त्यांनी बरीच एकमेकांना डेटदेखील केले. मुख्य म्हणजे नागार्जुन आणि तब्बू तब्बल १० वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सगळीकडे होती. पण नागार्जुन आधीपासून विवाहित असल्यामुळे त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर ते वेगळे झाले.

१० वर्षांचं नातं क्षणात तुटलं

अभिनेत्री तब्बू नागार्जुन यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यामुळे तिने नागार्जुन यांच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र तब्बूसोबत लग्न करण्यासाठी नागार्जुन याना आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागणार होता. ज्यासाठी ते तयार नव्हते. ज्यामुळे तब्बूने ठरवलं की, लग्न होणार नसेल तर, ब्रेकअप करुन वेगळं व्हायचं. अखेर नागार्जुन आणि तब्बू यांचं १० वर्षांचं नातं काही क्षणात तुटलं. ब्रेकअपनंतरही बराच काळ तब्बू नागार्जुन यांच्यात अडकून राहिली. तिने अनेक गोष्टींचा सामना केला. नागार्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तब्बूच्या आयुष्यात कुणीच आलं नाही किंबहुना तिने येऊन दिल नाही. त्यामुळे अभिनेत्रीने कधी लग्न करण्याचा देखील विचार केला नाही.