Benefits Of Aamras : उन्हाळ्यात आमरस पिताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; कोणताच त्रास होणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Aamras) उन्हाळा सुरु झाला की आंबा खाण्याचे मजेशीर दिवस सुरु होतात. वर्षातून एकदा येणारा आंबा मनसोक्त खाल्ल्याशिवाय उन्हाळ्याची मजा येत नाही. आंबा ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जातो उगीच का काय? आंबा हे असे फळ आहे जे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे आवडते आहे. असं म्हणतात मौसमी फळांचे सेवन कायम फायदेशीर ठरते. पण आंबा… मुळातच उष्ण, त्यात येतो सुद्धा उन्हाळ्यात. मग अशावेळी आंबा खाताना किंवा आमरस पिताना मनात भीती राहते. तर याच भीतीचं सोल्युशन आम्ही तुम्हाला देणार आहोत.

आंब्यात आंबा लाडाचा आणि त्यात आमरसाबद्दल बोलायचं तर तोंडाला पाणीच सुटेल. आमरस पुरीच्या बेताशिवाय उन्हाळ्यात राम नाही. पण आमरसाचे सेवन किती करावे? त्याचे सेवन केल्याचे शरीराचे काही नुकसान तर होत नाही ना? आणि असे बरेच प्रश्न कितीतरी लोकांना पडतात. (Benefits Of Aamras) तर आज आम्ही तुम्हाला उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आमरसाचे सेवन कसे आणि किती करावे? याबाबत महत्वाची माहिती देणार आहोत.

आमरस पिण्याचे फायदे (Benefits Of Aamras)

1. अधिक काळ ऊर्जा टिकते – आमरसाचे सेवन करण्यासाठी कोणती वेळ निश्चित करण्याची गरज नाही. कधीही, केव्हाही आणि कुठेही आमरस पिता येतो. मात्र, आरोग्यदायी फायद्यांसाठी आमरस सकाळी पिणे अधिक फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरात अधिक काळ ऊर्जा टिकून राहते.

2. पचनक्रिया मजबूत होते – आमरसाच्या सेवनामुळे पचनक्रिया मजबूत होते. शिवाय पोटाशी संबंधित इतर समस्या देखील कमी होतात. कारण आंब्यामध्ये असणारे फायबर आपल्याला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. परिणामी पचनक्रिया सुलभ आणि सुरळीत होते. (Benefits Of Aamras)

3. डायरियाच्या समस्येवर परिणामकारक – उन्हाळ्यात आमरसाचे सेवन केल्यास डायरियाची समस्या टळते. शिवाय मळमळ, उलट्या, जुलाब अशा समस्यांवर देखील मात करण्यासाठी आमरसाचे सेवन करावे.

4. संसर्ग टाळण्यासाठी फायदेशीर ठरते – उन्हाळ्यात कोणत्याही ऍलर्जी किंवा संसर्गापासून बचाव हवा असेल तर आंबे खाणे फायदेशीर मानले जाते. कारण आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे संक्रमणाशी लढायला मदत करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.

आमरस पिताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्या

एका दिवसात ‘एव्हढाच’ आमरस प्या

आमरसाचा सेवन आरोग्यासाठी चांगले असले तरीही मधुमेहींनी मात्र याचे रोज सेवन करू नये. यामुळे तुमची ग्लुकोज पातळी अनियंत्रित होऊ शकते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त १ ग्लासपेक्षा जास्त आमरस पियू नका. (Benefits Of Aamras) साधारण १ ग्लास आमरसात सुमारे १७० कॅलरीज असतात.

‘इतके’ दिवस आमरस साठवू नका

आंब्याचा रस जास्तीत जास्त २ दिवस ठेवता येईल. पण त्याहून अधिक काळ जर तुम्ही आमरस साठवला तर त्याचे गुणधर्म कमी होतात. तसेच तुमच्याकडून आमरस दीर्घकाळ राहिला तर त्याचे सेवन टाळावे. शिवाय आमरस बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आंब्यांवर काळे डाग किंवा ओरखडे नसतील याची काळजी घ्या.

जास्त आमरस प्यायल्याने काय होईल?

जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल आणि तुम्ही आमरसाचे जास्त सेवन केलात तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. (Benefits Of Aamras) शिवाय जर तुम्ही गर्भवती असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आंबा खाऊ नये. तसेच आमरसाचे अति सेवन केल्याने घसा खवखवणे किंवा ऍलर्जीचा त्रास संभवतो. याशिवाय काही लोकांना पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या देखील होऊ शकतात.