Maharashtra Railway : ‘या’ नव्या रेल्वे मार्गाला मिळाली गती! महाराष्ट्रातील 21 गावांमध्ये भूसंपादन सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Railway : रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे! अनेक वर्षांपासून रखडलेल्या मनमाड-इंदूर नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला अखेर वेग मिळालाय. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि नांदगाव तालुक्यांमधील २१ गावांमध्ये जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास गेल्यास महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. विशेष म्हणजे, मध्यप्रदेशातील काम जवळपास पूर्ण झालं असून, आता महाराष्ट्रातील (Maharashtra Railway) टप्प्यासाठी अधिकृत हालचाली सुरु झाल्या आहेत.

केंद्र सरकारकडून अधिकृत हालचाली

धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला गती दिली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती आणि आता ती नियुक्ती पूर्ण झाली आहे.

कुठल्या गावांमध्ये होणार भूसंपादन? (Maharashtra Railway)

प्रकल्पासाठी मालेगाव तालुक्यातील चोंढी, जळगाव, काळेवाडी, घोडेगाव चौकी, वर्हाणे, मेहुण, ज्वार्डी बु., येसगाव, सवंदगाव, सायणे बु., माल्हाणगाव, चिखलओहोळ, झोडगे गावांमध्ये जमिनीचे भूसंपादन होणार आहे. तर नांदगाव तालुक्यातील मनमाड, अस्तगाव, पांझणदेव, खाटगाव, नवसारी, भाडी गावांचा समावेश आहे. यामुळे मालेगाव व नांदगाव तालुक्यातील एकूण २१ गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे.

३१० किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग

मनमाड ते नवीन धुळे आणि नरडाणा ते डॉ. आंबेडकर नगर (इंदूर) दरम्यान ३०९.४३ किमी लांबीचा हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. हा प्रकल्प रेल्वे अधिनियम 1989 व 2008 च्या सुधारित तरतुदीनुसार राबवला जाणार आहे. (Maharashtra Railway)

महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; मुंबई- पुण्यात रुग्णसंख्या वाढली

‘अमृत योजने’तून विकसित होणारा महत्त्वाचा दुवा

या प्रकल्पामुळे विद्यमान रेल्वे जाळ्यावरील ताण कमी होणार असून, नव्या मार्गामुळे धुळे, नंदुरबार, नाशिक आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांचा थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. व्यापार, पर्यटन आणि उद्योग क्षेत्रालाही या मार्गामुळे मोठी चालना मिळेल.