Maharashtra Tourism : ‘हे’ आहे फेब्रुवारी मार्च महिन्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातलं बेस्ट ठिकाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Tourism : रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ स्वत:साठी काढून तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायला आवडत असेल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या अशा एका ठिकाणाबाबत सांगणार आहोत जिथे गेल्यावर तुम्हाला फिरल्याचा आनंद आणि मन शांती दोन्ही मिळेल. आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत हे ठिकाण म्हणजे कोकणातील रत्नागिरी. चला तर मग रत्नागिरीला कसे जाल (Maharashtra Tourism) ? तिथे काय काय पाहाल सर्वकाही जाणून घेऊया.

आता कोकण म्हंटल की,सुंदर निळाशार समुद्र, रत्नागिरीचा (Maharashtra Tourism)प्रसिद्ध आंबा आणि नारळाची झाडं असं बरच काही सांगता येईल. मात्र रत्नागिरीच्या बाबतीतली सर्वात महत्वाची गोष्ट म्हजे इथलं वातावरण. एका बाजूला सुंदर डोंगर रांगा आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असल्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक आहे. शिवाय फेब्रुवारी आणि मार्च महिना येथे जाण्यासाठी उत्तम आहे.

कधी भेट देऊ शकता ? (Maharashtra Tourism)

उन्हाळी किंवा हिवाळी सुट्टीच्या व्यतिरिक्त तुम्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये रत्नागिरीला भेट देऊ शकता. उन्हाळयात भेट दिली तर आंबा, फणस ,काजू असा उन्हाळ्यातला रानमेवा तुम्हाला चाखायला मिळेल. पावसाळ्यात या भागात जास्त पाऊस पडतो तसेच येथील स्थानिक लोक तेव्हा भातशेतीमध्ये व्यस्त असतात.

कसे जाल ?

येथे जाण्यासाठी रेल्वे, बस ची सुविधा आहे.

ही ठिकाणे पहाच

रत्नदुर्ग किल्ला

हा रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहरापासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावरच आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात एक छुपा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग थेट अरबी समुद्रात बाहेर पडतो. रत्नागिरी (Maharashtra Tourism) शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना हा किल्ला म्हणजे मुख्य आकर्षण वाटतो. विशेष म्हणजे या किल्ल्याच्या तीनही बाजूने अरबी समुद्र वेढला आहे. या किल्ल्याच्या आग्नेयला जमीन तर किल्ल्याच्या पायथ्याशी मिरकर वाडा हे बंदर आहे. या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नाले सारखा तर किल्ल्यावरून दिसणारा सुंदर समुद्र इथल्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो.

या किल्ल्याचे क्षेत्रफळ हे 120 एकर इतका आहे. किल्ल्याची लांबी अंदाजे 1300 m आणि रुंदी 1000 m आहे तर किल्ल्याच्या दक्षिण पूर्वेकडून पश्चिमेकडे मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या मध्यभागी एक मुख्य प्रवेशद्वारे एका बुरुजावर दीपगृह आहे. या बुरुजाला सिद्ध बुरुज असं म्हटलं जातं. किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर असलेलं भगवतीचे मंदिर हे शिवकालीन आहे. याच्या बाले किल्ल्याला नऊ बुरुज आहेत तर संपूर्ण किल्ल्याला एकूण 29 बुरुज आहेत. हा किल्ला बालेकिल्ला आणि दीपगृह तसेच किल्ला पेठ अशा तीन भागांमध्ये (Maharashtra Tourism) विभागला गेला आहे. या किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह आहे.

गणपतीपुळे (Maharashtra Tourism)

समुद्रकिनाऱ्यावर असलेले गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. येथील हे मंदिर 400 वर्षे जुने असून येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील समुद्र प्रसिद्ध आहे. या समुद्राचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीपुळ्याला जसजसे तुम्ही जवळ याला तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवई यायला सुरुवात होते. तसे पाहायला गेले तर अनेक मंदिरांमध्ये देवाच्या मूर्तीचे तोंड हे पूर्वेकडे असते मात्र या गणपतीपुळ्याच्या गणपतीचे मुख हे पश्चिम दिशेला आहे. म्हणूनच हा गणपती पश्चिम द्वार देवता म्हणून ओळखला जातो. गणपतीची प्रदक्षिणा जवळपास एक ते दीड किलोमीटर इतकी आहे आणि याची प्रदक्षिणा काढणे हे खूप भाग्याचा मानलं जातं.

आरे वारे बीच

आरे वारे बीच हा महाराष्ट्रातील फारच कमी लोकांना माहिती असलेला समुद्रकिनारा आहे. जो रत्नागिरी ते गणपतीपुळे ला जोडला गेला आहे. कोकणातून रत्नागिरीकडे आल्यावर मध्यभागी हा बीच आहे. रस्त्याच्या एका बाजूला समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूला टेकड्या आहेत. रस्ता ओलांडल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचाल त्याला आरे-वारे व्ह्यू पॉइंट म्हणतात. ह्या बीच वरील पाणी स्वच्छ आहे. शिवाय तुम्हाला शांततेत वेळ घालवायचा असेल तर हा बीच परफेक्ट आहे.