Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. बैसरन भागात घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांच्या गटावर अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात १२ जण जखमी झाले असून, त्यापैकी चार (Pahalgam Attack) जणांची प्रकृती गंभीर आहे. दुर्दैवाने एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी तातडीने फोनवर चर्चा केली. मोदींनी या हल्ल्याच्या तीव्र शब्दांत निंदा केली असून, “कोणत्याही दोष्याला माफ केलं जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.
Pahalgam Attackपंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया (Pahalgam Attack)
ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले: “मी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा करतो. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे होवो, हीच प्रार्थना. या जघन्य कृत्यामागील गुन्हेगारांना न्यायासमोर आणले जाईल. त्यांना माफ केलं जाणार नाही. देशाचा दहशतवादाविरोधातील संकल्प अधिक बळकट होईल.”
गृहमंत्री अमित शहांची तातडीची कृती (Pahalgam Attack)
अमित शहांनीही या हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत लिहिले: “जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला अतिशय दु:खद आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. या हल्ल्यामध्ये सामील असलेल्या कोणत्याही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही. पंतप्रधानांना या घटनेबाबत माहिती दिली आहे. मी लवकरच श्रीनगरकडे रवाना होत असून सर्व सुरक्षा यंत्रणांसोबत आढावा बैठक घेणार आहे.”
#WATCH | दिल्ली: पहलगाम में पर्यटकों पर हुए आतंकवादी हमले के मद्देनजर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और जम्मू-कश्मीर के उपराज्यपाल मनोज सिन्हा श्रीनगर के लिए रवाना हुए। pic.twitter.com/fNqYmOFs7X
— ANI_HindiNews (@AHindinews) April 22, 2025
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला रामबनमधून श्रीनगरला परतले असून, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.
“मृतांचा नेमका आकडा स्पष्ट झाल्यानंतर अधिकृत माहिती देण्यात येईल. मात्र, हे स्पष्ट आहे की हे हल्ले गेल्या अनेक वर्षांत (Pahalgam Attack) नागरिकांवर झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे.”
सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर (Pahalgam Attack)
हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. श्रीनगर आणि परिसरात सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नाही, तर देशाच्या शांततेवर आणि सुरक्षिततेवर केलेला आघात आहे. केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणा याला जोरदार प्रत्युत्तर देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.