Pakistani content banned in India: भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा आणि ठोस निर्णय घेतला आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने देशभरातील सर्व OTT प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल इंटरमीडियरीजना पाकिस्तानशी संबंधित कोणताही व्हिडीओ कंटेंट थांबवण्याचे (Pakistani content banned in India) आदेश दिले आहेत.
हा निर्णय वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर प्रकारच्या स्ट्रिमिंग कंटेंटवर लागू होतो, मग तो विनामूल्य असो किंवा सबस्क्रिप्शनवर चालणारा. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य (Pakistani content banned in India)
सरकारने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय देशाच्या सार्वभौमत्वाची, सुरक्षेची आणि नागरिकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी घेण्यात आला आहे. सध्या पाकिस्तानातील परिस्थिती, विशेषतः ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात सुद्धा ‘सॉफ्ट इन्फ्लुएन्स’ चा धोका कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
In the interest of national security, all OTT platforms, media streaming platforms and intermediaries operating in India are advised to discontinue the web-series, films, songs, podcasts and other streaming media content, whether made available on a subscription based model or… pic.twitter.com/8yjP6ULNEU
— ANI (@ANI) May 8, 2025
पाकिस्तानमध्ये सतत ड्रोन हल्ले (Pakistani content banned in India)
दरम्यान, पाकिस्तानमधील कराची, लाहोर, गुंजरावाला, चकवाल, घोटकी आणि उमरकोट या 6 प्रमुख शहरांमध्ये एकूण 12 ड्रोन हल्ल्यांची** पुष्टी झाली आहे. विशेषतः कराचीमधील आर्मी बेसवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर सैन्याच्या नियंत्रणाखाली घेण्यात आला आहे.
लाहोरच्या नंतर कराचीसारख्या आर्थिक आणि अण्वस्त्र भांडाराच्या दृष्टिकोनाने संवेदनशील शहरात ड्रोन हल्ला होणे, ही पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेची गंभीर दुर्दशा दाखवते. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कराचीतील बेसवर मोठा स्फोट झाला असून परिसरात घबराट आणि अराजकता पसरली आहे.
एअर डिफेन्स सिस्टम फेल
या हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे निष्क्रिय दिसले. विशेष म्हणजे, या घटनेच्या आदल्या दिवशीच पाकिस्तानचे (Pakistani content banned in India) पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी वायुसेनेची उघडपणे स्तुती केली होती, आणि “वायुसेना पूर्ण क्षमतेने सज्ज आहे,” असा दावा केला होता. मात्र काही तासांतच या ड्रोन हल्ल्यांनी त्यांच्या विधानाची पोलखोल केली.
‘ऑपरेशन सिंदूर’वर केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक
दरम्यान, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या प्रत्युत्तरात्मक कारवाईबाबत केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांना ऑपरेशनच्या सद्य स्थितीची माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, आणि सीमेवरील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजनाथ सिंह यांनी तसेच सांगितले की, काही संवेदनशील माहिती सध्या गोपनीय ठेवावी लागेल, कारण सुरक्षेच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या संकटाच्या वेळी “आम्ही सरकारसोबत आहोत” असे म्हणत सहकार्याचे आश्वासन दिले.
भारत सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे फक्त सांस्कृतिक सामग्रीवर बंदी नव्हे, तर तो राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यापक धोरणाचा (Pakistani content banned in India) भाग आहे. डिजिटल माध्यमांतून येणाऱ्या सॉफ्ट थ्रेट्सवर अंकुश ठेवणे ही आजच्या घडीची गरज बनली आहे. एकीकडे पाकिस्तानमध्ये सुरक्षेची अधोगती दिसतेय, तर दुसरीकडे भारत सावध, सज्ज आणि स्पष्ट भूमिका घेणारा देश म्हणून उभा आहे.




