Taapsee Pannu : तापसी पन्नूने केलं गुपचूप लग्न? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Taapsee Pannu) बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिने विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. कधी हॉट लूकमुळे तर कधी पॅपराझींसोबत झालेल्या बाचाबाचीमुळे तापसी पन्नू कायम चर्चेचा विषय ठरते. मात्र यावेळी तापसी तिच्या प्रोफेशनल नव्हे तर पर्सनल आयुष्यामुळे सोशल मीडिया अट्रॅक्शन ठरली आहे. एका वृत्तानुसार, बॉलीवुड अभिनेत्री तापसी पन्नूने गुपचूप पद्धतीने लग्न केल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, तापसीच्या ‘हसीन दिलरुबा’ सिनेमातील सहकलाकार पवेल गुलाटीने शेअर केलेल्या एका फोटोमुळे चर्चांनी आणखीच जोर धरला आहे.

होय. समोर आलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपासून अनेक वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, तापसी (Taapsee Pannu) तिचा लाँगटाइम बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्यासोबत लग्न करणार आहे. मध्यंतरी तापसीने दिलेल्या एका मुलाखतीवरून असा अंदाज लावण्यात आला होता. अशातच आता तापसी आणि मॅथियास दोघांनी गुपचूप पद्धतीने लग्न केल्याचे सांगितले जात आहे.

उदयपूरमध्ये बांधली लग्नगाठ (Taapsee Pannu)

तापसीचा लॉंगटाईम बॉयफ्रेंड मॅथियास बो हा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला बॅडमिंटनपटू आहे. सांगितलं जातंय की, मॅथियास आणि तापसी यांनी २३ मार्च २०२४ रोजी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तापसी आणि ऑलम्पिक पदक विजेता मॅथियास बो यांनी आपले कुटुंबिय आणि अत्यंत जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले आहे. असेही सांगितले जात आहे की, त्यांच्या लग्नाच्या विधी २० मार्च २०२४ रोजी सुरू झाल्या होत्या. मात्र, मीडिया अटेंशन टाळण्यासाठी त्यांनी गुपचूप पद्धतीने लग्न केले आहे.

आतापर्यंत अनेक वृत्त संस्थांच्या माध्यमातून तापसी आणि मॅथियास यांच्या गुपचूप लग्नाबद्दल बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर देखील याविषयी चर्चा सुरु आहे. असे असताना तापसीने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तापसीचे चाहते तिच्या अधिकृत विधानाची वाट पाहत आहेत. (Taapsee Pannu) दरम्यान तापसीने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘मला जेव्हा मुलं हवी असतील तेव्हाच मी लग्न करेन आणि माझं लग्न फक्त एका दिवसात होईल. मी काही खूप मोठा सोहळा करणार नाही’.