Tral encounter drone video : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात आज 15 मे रोजी सुरक्षाबलांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन स्थानिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईनंतर आता समोर आलेल्या एका ड्रोन व्हिडीओने खळबळ उडवली आहे. या व्हिडीओमध्ये एका दहशतवाद्याला गोळी लागून तो मृत्यूपूर्वी जमिनीवर तडफडत असल्याचं दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. हे दृश्य सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, दहशतवाद्यांची दुर्दशा आणि भारतीय सुरक्षाबलांची अचूक कारवाई याचे प्रत्यक्ष साक्षीदार अनेक लोक झाले (Tral encounter drone video ) आहेत.
काय आहे व्हिडिओत ?
व्हिडीओमध्ये काही दहशतवादी एका घरात लपलेले दिसतात. त्यांचा मागोवा घेत असलेल्या ड्रोनद्वारे त्यांच्या हालचाली टिपल्या जातात. काही क्षणांतच भारतीय लष्कराच्या जवानांकडून जोरदार फायरिंग सुरू होते आणि एका दहशतवाद्याला गोळी लागते. तो कोसळतो आणि जमिनीवर तडफडत राहतो. या दृश्याने दहशतवाद्यांच्या अमानवी मार्गाचा शेवट किती भीषण असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.
Tadapne wali maut by 42RR 💀
— KiloMike2🇮🇳 (@TacticalKafir) May 15, 2025
Tral encounter today, 3 terr0rists neutralized !! pic.twitter.com/gytt6aSd10
तीन आतंकवाद्यांचा खात्मा
या एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. आसिफ अहमद शेख, आमिर नजीर वानी आणि यावर अहमद बट्ट. हे तिघेही त्रालचे स्थानिक रहिवासी होते आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सक्रिय सदस्य होते. मुठभेड़ त्रालच्या नादेर गावात झाली. सुरक्षाबलांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गावात दहशतवादी लपलेले असल्याचं कळालं. त्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसर वेढला आणि संशयास्पद हालचाल लक्षात येताच त्वरित कारवाई केली.
📍The hunt continues
— OsintTV 📺 (@OsintTV) May 15, 2025
Tral Encounter Drone Shot
Sabko chun chunkar marenge, terrorists days are numbered
Video source- @AnuveshRath pic.twitter.com/ODYQ1jCnhb
पोलिसांनी काय सांगितलं ?
काश्मीर पोलिसांनीही या एन्काउंटरविषयी अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, अवंतीपोरा येथील नादेर, त्राल भागात मुठभेड़ सुरू झाली असून, सुरक्षाबल आपलं काम करत आहेत. दरम्यान, 14 मे रोजी शोपियां जिल्ह्यातही भारतीय सेनेने ऑपरेशन ‘केलर’ अंतर्गत लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं. शोकल केलर भागात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षाबलांनी ही कारवाई केली.
या संपूर्ण घटनाक्रमातून हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे की दहशतवादाच्या मार्गावर चालणाऱ्यांचा शेवट नेहमीच तडफड आणि मृत्यूच्या भयावह छायेखालीच होतो. भारतीय सुरक्षाबलांची तांत्रिक प्रगती, शौर्य आणि वेळेवरची प्रतिक्रिया ही काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्णायक ठरत आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांमध्ये भीती आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.




