Travel : महाराष्ट्रातील एक असे हिल स्टेशन ज्याचे आहे थेट महाभारताशी कनेक्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel : महाराष्ट्र हे राज्य निसर्गसौन्दर्याने नटलेले राज्य आहे. एवढेच नाही तर या राज्यात अनेक अशी ठिकाणे आहेत ज्याचे ऐतिहासिक महत्व आहे. आज आपण अशाच एका ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे नाव थेट महाभारताशी जोडले जाते. चला तर मग जाणून घेऊन हे ठिकाण (Travel) नक्की कोणते आहे. काय आहे त्याचे महाभारताशी कनेक्शन?

महाराष्ट्रातील विदर्भातील चिखलदरा येथे महाभारत काळातील अनेक रहस्ये दडलेली आहेत. अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी येथे काही काळ व्यतीत केल्याची माहिती आहे. असे म्हंटले जाते की, आणि हे तेच ठिकाण (Travel) आहे जिथे भीमाने द्रौपदीचा अपमान केल्याबद्दल किचकचा वध केला होता. भीमाने त्याचे राक्षसी रूप दाखवून किचकचा वध करून त्याला जवळच्या खंदकात फेकून दिले.आता हे ठिकाण एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे. चला जाणून घेऊया या इतिहासकालीन ठिकाणाबद्दल…

चिखलदरा हे एक सुंदर हिल स्टेशन आहे, जे पाहण्यासाठी लोक खूप लांबून येतात. हा डोंगराळ भाग नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. याशिवाय या ठिकाणाला पौराणिक महत्व देखील आहे. इतिहासकारांवरम्हणण्यानुसार हे ठिकाण (Travel) एकेकाळी विराट राजाचं नगर होतं. जे विराट नगर म्हणून ओळखले जात होते.

भीमकुंड (Travel)

हे पौराणिक ठिकाण 1823 मध्ये रॉबिन्सन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने शोधले होते. या जागेचा वापर ब्रिटीशांनी कॉफी गार्डन आणि आरोग्याशी निगडीत गोष्टी विकसित करण्यासाठी केला होता. आजूबाजूला अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जिथे जाऊन तुम्हाला एक वेगळा अनुभव घेता येईल.

पंचबोल आणि देवी पॉइंट

भीमकुंड व्यतिरिक्त, आपण येथे स्थित पंचबोल आणि देवी पॉइंट देखील पाहू शकता. पंचबोल पॉइंट (Travel) हे डोंगर रंगांसाठी ओळखले जाते. जिथे आपण सुंदर कॉफीचे मळे पाहू शकता. याशिवाय तुम्हाला येथे पाच टेकड्या आणि कोसळणारा धबधबाही पाहता येतो. जवळच असलेले देवी कुंड हे सुंदर पाण्याच्या प्रवाहांसाठी ओळखले जाते. जिथे स्थानिक लोकांच्या देवीचे मंदिर देखील आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.

गाविलगड किल्ला (Travel)

वर नमूद केलेल्या ठिकाणांनंतर, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही जवळच असलेल्या प्राचीन गाविलगड किल्ल्याची अद्भुत दृश्ये पाहू शकता. हा किल्ला सुमारे 300 वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते. जिथे एकेकाळी हिंदू राजे आणि मुघल सम्राटांचे राज्य होते. या किल्ल्यावर सुंदर प्राचीन शिल्पे आहेत, जी आजही सुस्थितीत आहेत. येथे ठेवलेल्या तोफांचेही दर्शन घडते. याशिवाय येथील (Travel) तलावही पाहण्यासारखे आहेत.

कसे पोहचाल ?

तिन्ही मार्गांनी चिखलदऱ्याला जाता येते. येथील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक अमरावती आहे. हवाई मार्गासाठी तुम्ही नागपूर विमानतळाची मदत घेऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रस्त्यानेही येथे पोहोचू शकता. चिखलदरा हे राज्यातील अनेक मोठ्या (Travel) शहरांशी चांगल्या रस्त्यांनी जोडलेले आहे.