Travel : भेट द्या रघुवीर घाटाला ; अनुभवा पावसाळ्यातील खरे निसर्गसौंदर्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel : आकाशातून कोसळणाऱ्या जलधारा , आजूबाजूला मस्त हिरवळ आणि धुक्यांची दाट चादर … हे चित्र अनुभवयाला निसर्ग प्रेमी पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या महाराष्ट्राला निसर्गाचं अतुलनीय देणं लाभलं आहे. हा निसर्गसंपन्न महाराष्ट्र पावसाळ्यात अधिकच सुंदर होतो. तुम्ही देखील रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मस्तपैकी पावसाळी पर्यटनाला जायचा प्लॅन करीत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अप्रतिम ठिकाणाबद्दल (Travel) सांगणार आहोत जिथला पावसाळी अनुभव म्हणजे निव्वळ अविस्मरणीय… चला जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल …

आम्ही ज्या ठिकाणाबद्दल सांगत आहोत हे ठिकाण म्हणजे रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट हा घाट 12 किलोमीटरचा असून याची उंची ही समुद्रसपाटीपासून 760 मीटर आहे. कोकणातून रघुवीर घाटाला जात असताना एका बाजूला सुंदर हिरवेगार डोंगर आणि भाताची लावण तुम्हाला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळेल. घाटाला जात असताना काळाकुट्ट डांबरी रस्त्यावरून आजूबाजूची हिरवळ पाहणं हे नेत्र सुखद असते यात (Travel) शंका नाही.

लाला रंगाचे खेकडे (Travel)

तर खेड मार्गे तुम्ही या घाटाकडे येत असतात तेव्हा बीजगर हे गाव लागतं त्या ठिकाणी 375 वर्षांपूर्वीच प्राचीन शिवपार्वती काळकाई मनाई मंदिर असून हा परिसर खूप पाहण्यासारख्या या मार्गे जेव्हा तुम्ही घाटावरती जाल तेव्हा तुम्हाला निसर्गाची किमया पाहायला मिळेल. या ठिकाणी काळा दगडांवर तुम्हाला लाल रंगाचे खेकडे नक्की पाहायला मिळतील.

रघुवीर घाटावर एक अद्भुत असं दृश्य तुम्ही पाहू शकता डोंगर रांगांमध्ये एक लांब अशी डोंगराची माची आहे. हे पाहण्यासाठी आतपर्यंत रेलिंगची सुविधा करण्यात आलेली आहे. या रेल्वेमध्ये बसायला पेपर ब्लॉकचा फुटबॉल बांधलेला आहे आधार तुम्ही थेट दरीत जाण्याचा अनुभव घेऊ शकता. शिवाय याच मार्गावरून तुम्ही महाबळेश्वरला सुद्धा जाऊ शकता या ठिकाणी असलेल्या सिंधी गावातील खिंडदेखील खूप पाहण्यासारखे व या ठिकाणी (Travel) असलेले अनेक स्पॉट फोटो घेण्यासाठी उत्तम आहेत.

धबधबे आणि धुक्यांची चादर (Travel)

सुंदर डोंगर रांग आणि त्यातून वाहणारे छोटे छोटे धबधबे हे तुमचे मन मोहून टाकतील आणि चिंब भिजण्यासाठी सुद्धा हे ठिकाण उत्तम आहे. हे ठिकाण रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणार आहे आणि खेड तालुक्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. या घाटाच्या बाजूला खोपी नावाचं गाव आहे आणि खोपि धरणाच्या वरच्या बाजूला उंचीवर घाट मार्ग आहे. या घाटात पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे, थंडगार वातावरण आणि धोक्यांची दाट चादर ही पर्यटकांना नेहमीच भुरळ (Travel) घालत राहते.