Weather Update Today : उन्हाच्या झळांमध्ये काहीसा दिलासा देणारा पाऊस आता चिंता वाढवत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, आज (८ मे) राज्यात काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा धोका हवामान विभागाने वर्तवला (Weather Update Today) आहे. काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नाशिक, पुणे, जळगाव, बीड, सातारा, औरंगाबादसह १० पेक्षा अधिक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गारपीट आणि पिकांचं नुकसान (Weather Update Today)
हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे की, दक्षिण तेलंगण परिसरात सक्रिय असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल दिसून येतोय. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ हवामान, गारपीट आणि वादळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचंही समोर येतंय.
कोणत्या जिल्ह्यांना मिळाला अलर्ट? (Weather Update Today)
- ऑरेंज अलर्ट: पुणे, जळगाव, नाशिक, बीड, सातारा, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जालना – येथे जोरदार वादळी वाऱ्यांसह गारपीटीची शक्यता.
- यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली – येथे तुरळक पावसाची शक्यता.
पालघरमध्ये घरांची पडझड
पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसत आहे. सकाळी पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली असून, ग्रामीण भागातील अनेक घरांची पडझड झाली आहे. भातशेती, वीट व्यवसायांनाही फटका बसल्याची माहिती आहे. पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक असून पूर्व भागात पावसाची रिपरिप सुरू आहे.
कल्याणमध्ये झाड पडून मृत्यू
काल रात्री कल्याण पूर्व भागात आलेल्या पावसामुळे झाड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. आज सकाळपासूनच (Weather Update Today) ढगाळ वातावरण असून, काही वेळांपूर्वी जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तापमानात घट, हवामानात बदलाचे संकेत
सध्याच्या पावसाळी हवामानामुळे राज्यभरात तापमानात घसरण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तास राज्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. पावसामुळे नागरिक आणि शेतकरी वर्गाने काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.