आर्थिक संकटावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच चांद्रयान मिशन- ममता बॅनर्जी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | विक्रम लँडर चांद्रभूमीवर उतरण्यास अवघे काही तास बाकी असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी चांद्रयान-२ मोहिमेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यावरून लक्ष हटविण्यासाठी चांद्रयान-२ मोहिमेचा वापर केला जात आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.एका कार्यक्रमात भाषण करताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारताने यापूर्वी चांद्रयान मोहीम राबवलीच नव्हती, अशा थाटात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या मोहिमेचा गवगवा करत आहे.

खरे तर देशातील आर्थिक संकटावरून देशवासियांचं लक्ष विचलीत करण्यासाठीच हा खटाटोप सुरू आहे, अशी टीका बॅनर्जी यांनी केली आहे.यावेळी ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना झालेल्या अटकेच्या अनुषंगानेही केंद्रावर टीका केली. चिदंबरम प्रकरणी कायदा त्याचं काम करेलच. पण भाजप सरकारने चिदंबरम यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी होती, असं त्या म्हणाल्या.

आसाममध्ये एनआरसीच्या यादीतून भारतीयांचीच नावं वगळली आहेत. त्यामुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शब्दांत सांगायचे तर राजकारण करण्याऐवजी मोदी सरकारने अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, असा टोला लगावतानाच मीडिया, न्यायपालिका आदी लोकशाहीचे सर्व स्तंभ सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Leave a Comment