काँग्रेसच्या दिलीप सानंदांची निवडणुकीतून माघार; ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत घेतला निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा प्रतिनिधी। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सानंदा यांच्या निवडणूक न लढवण्यामागे एक वेगळेच असल्याचे कारण समोर येत आहे. ईव्हीएमने घेतल्या जाणाऱ्या मतदानावर संशय असल्याचे कारण पुढे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणुकीतूनच माघार घेण्याची भूमिका घेणारे सानंदा हे पहिलेच उमेदवार असावेत. याबाबत सानंदा यांनी एक पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सानंदा म्हणाले की, ‘खामगाव मतदारसंघातून मीच निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह होता. परंतु मी दोन महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.’ असल्याचा दावा सानंदा यांनी केला आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे पहिल्या यादीतच माझ्या नावाचा समावेश होण्याची शक्यता होती; मात्र २८ सप्टेंबरला दुपारी मुुकुल वासनिक व बाळासाहेब थोरात यांना मी निवडणूक न लढविण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे लेखी पत्र देऊन तसेच फोन वरूनही कळविले असल्याचेही सानंदा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान सानंदा हे निवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले होते. त्यांनी खामगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला; मात्र तेच मेळाव्याला हजर नव्हते. मुलाच्या आजारपणामुळे मला मुंबईला जावे लागले होते, असा खुलासा त्यांनी केला असला तरी या निमित्ताने त्यांची न लढण्याची मानसिकता समोर आली होती त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.

Leave a Comment