देशात सध्या तुकडे तुकडे गँगची सत्ता – तुषार गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘देशात सध्या तुकडे-तुकडे गँगची सत्ता आहे,’ असा जोरदार आरोप त्यांनी ट्विटरवरून केला आहे. सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

 

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभर झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. आंदोलन व्यवस्थितरित्या न हाताळल्यानं सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळं संतापलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडंच काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं होतं. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तुकडे-तुकडे गँग देशात अशांतता पसरवत आहे. त्यांना अद्दल घडवावी लागेल,असे शहा यांनी म्हंटले होते. अमित शहा यांच्या या विधानावर टीका करण्यासाठी तुषार गांधी यांनी हे ट्विट केले आहे.

Leave a Comment