पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार – मल्लिकार्जुन खर्गे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. काँग्रेसच्या वतीने आज ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न

मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारांनी या संविधानाच्या मार्गाने चालून देशात लोकशाही रूजवली व वाढवली. संविधानाने सर्वांना समानतेचा हक्क दिला आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या भाजप सरकारने संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी व एनपीआर ही त्या प्रक्रियेचा भाग आहेत. संविधानाला पायदळी तुडवून देशात धार्मिक फूट पाडण्याचा व अराजकता पसरवण्याचा प्रयत्न मोदी शाह करत आहेत. त्यांना चले जावो सांगण्यासाठीच भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढला असल्याचे खर्गे यांनी सांगितले.

नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी व एनपीआर संविधान बदलण्याच्या प्रक्रियेचा भाग

नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी व एनपीआर हे सर्व संविधान बदलण्याच्या प्रक्रियेचा भाग आहेत. संविधानाला पायदळी तुडवून देशात धार्मिक फूट पाडण्याचा व अराजकता पसरवण्याचा प्रयत्न मोदी शाह करत आहेत. त्यांना चले जावो सांगण्यासाठीच भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढला असल्याचे खर्गे यांनी सांगितले.

Leave a Comment