मस्जिदीला देण्यात आलेल्या ५ एकरात काँग्रेस भवन उभारा – इम्तियाज जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | आम्ही इतके दिवस लढलो ते पाच एकर जागेसाठी नाही. आमची लढाई खैरातीसाठी नव्हती. आम्हाला हा दिवस काँग्रेस पक्षामुळेच पहायला लागत आहे असं मत एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे. मस्जिदीला देण्यात आलेल्या ५ एकरात काँग्रेस भवन उभारा असं म्हणत जलील यांनी अयोध्या निकालाबाबत आपली नापसंती व्यक्त केली आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत जलील बोलत होते.

काँग्रेस पक्षामुळेच आज आम्हाला हा दिवस पहावा लागत आहे. पाच एकर जागेसाठी आम्ही इतके वर्ष लढा दिला नाही. तेव्हा समाजाला मी आवाहन करतो ली अयोध्या निकालात मुस्लिम समाजाला देण्यात येणारी पाच एकर जमिन आपन काँग्रेस पक्षाला दान करावी. त्या जमिनीवर काँग्रेस भवन उभारावं असं जलील यांनी म्हटल अाहे.

दरम्यान मी हैदराबाद मध्ये फिरुन भिक मागितली तरी पाच एकर जमिन मिळेल असं वक्तव्य एमआयएम नेते ओवेसी यांनी आज केले. त्यानंतर आता खासदार जलील यांनी अयोध्या निकालावर आपले मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment