रिझर्व्ह बँकेबाबत राज ठाकरेंचं भाकित खरं ठरलं ? व्हिडिओ शेअर करत मनसेचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र |नोटाबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं भाकित खरं ठरलं, असं ट्वीट मनसेने केलं आहे. 9 ऑगस्टला राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत हा दावा करण्यात आला आहे.

 

देशातील आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे विविध क्षेत्रात मंदीची चाहूल लागली आहे. काही कर्मचाऱ्यांवर रोजगारापासून मुकण्याची वेळ आली आहे. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी केंद्राने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 1 लाख 76 हजार कोटी रुपये घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे.विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली असताना मनसेनेही यात उडी घेतली आहे. राज ठाकरेंनी 9 ऑगस्टच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या भाषणाची आठवण करून देत मनसेने केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. पैसेरहित अर्थक्रांतीला सुरुवात झाल्याचं मनसेने शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला म्हटलं आहे.

दरम्यान आरबीआयकडून पैसे घेऊन देश चालवायला लागत आहे. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तिथे पैसे रिझर्व्ह म्हणजे राखीव ठेवले जातात. समजा, एखाद्या बँकेने तुमचे पैसे बुडवले तर त्यासाठी हमी म्हणून रिझर्व्ह बँक असते. लोकांना याचा त्रास होऊ नये म्हणून. जर त्याच रिझर्व्ह बँकेतून सरकार पैसा काढणार असेल तर उद्या बँका डबघाईला आल्यावर तुम्हाला कोण पैसे देणार? तुमचे पैसे कुठून मिळणार आहेत? असे राज यांनी म्हणले होते.

Leave a Comment