कोयना धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात 1500 क्युसेक्स सोडले पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कोयना धरणाची महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी ओळख आहे. या धरणाच्या पायथा वीज गृहातील दोन्ही युनिट मधून आज दुपारी एक वाजता 1 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. कृष्णा व कोयना नदीकाठावरील परिसरातून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांना भरपूर पाणी देणे आवश्यक बनले आहे. दरम्यान नदीपात्रातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी नदी विमोचकामधून 1 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापन प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला. त्यानुसार आज दुपारी एक वाजता पायथा वीज गृह आणि नदी विमोचकामधून पाण्याचा अतिरिक्त विसर्ग सुरु करण्यात आला.

शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतात घेत असलेल्या शेतमालास किती दर मिळाला आहे. हे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधिक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

दरम्यान, धरण व्यवस्थापनाने सोडलेल्या पाण्यामुळे शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. आता धरणातून एकूण 3 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू असून नदीपात्रामध्ये 2 हजार 100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना जलाशयाची पाणी पातळी 2 हजार 126.07 फुट असून धरणातील शिल्लक पाणीसाठा 67.05 टीएमसी इतका आहे.