राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती होणार; मंत्री केसरकरांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची पदे भरली जातील व यासंदर्भात आजच जीआर काढण्यात येईल, असे देखील केसरकर म्हणाले आहेत.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, ‘औरंगबाद हाय कोर्टचा स्टे या भरतीच्या संदर्भात होता. त्यामुळे या भरतीच काम लांबल गेलं होत. पण काही जिल्ह्यांमध्ये शाळेत अजिबात शिक्षक नाही, अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे. हाय कोर्टचा स्टे उठल्याने आता शिक्षक भरतीला सुरुवात होणार असून, व त्यासोबतच नवीन शिक्षक म्हणून जॉईन करणाऱ्यांना आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये जाणार आहोत, याची चॉईस सुद्धा द्यावी लागते. यामुळे या प्रक्रियेला साधारण एक महिना लागणार असल्याचं केसरकर यांनी म्हंटल.

शिक्षणमंत्री केसरकर यांच्या घोषणेमुळे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच याआधी केसरकर यांनी राज्यातील शिक्षकांच्या बदल्या रद्द करून, गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार असल्याचे सांगितले होते. अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने त्यांच्यावर अधिकचा भार येत असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे राज्यात शिक्षक भरती होणंअत्यंत गरजेचं होते.

शिक्षकांच्या बदल्यावर काय आहे नवीन धोरण?

नव्या धोरणानुसार, एकाच शाळेवर किमान पाच वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत समावेश केला आहे. या एकूण बदल्यांमध्ये संवर्ग एकमधील 6 हजार 690 आणि संवर्ग दोनमधील 3 हजार 400 शिक्षकांचा समावेश केला आहे.