Saturday, December 13, 2025
Home Blog

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर मिळणार या 2 सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg । मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत असतात. आत्तापर्यंत हा महामार्ग सुरु झाल्यापासून हजारो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अपघाताची कारणे जरी वेगवेगळी असली तरी सततच्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. आता या महामार्गावर अपघात झाल्यावर तात्काळ मदत आणि उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे आणि एअर ॲम्बुलन्स सेवा पुरवणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली. नागपूर – मुंबई हा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग विदर्भ मराठवाड्याला समृद्ध करणारा महत्त्वाचा महामार्ग (Samruddhi Mahamarg) आहे. या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करण्यास सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. समृद्धी महामार्गावर सध्या 22 ठिकाणी इंधन स्थानके आणि स्नॅक्स सेंटर स्वच्छतागृहासह कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 21 ठिकाणी प्रत्येकी 20 असे एकूण 420 एफआरपी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची देखभाल व स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत.

एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन Samruddhi Mahamarg

मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार मिळावेत यासाठी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नागपूर ते मुंबईदरम्यानच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच महत्वाचं म्हणजे या महामार्गावर एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ इत्यादींना अपघातांची / इतर घटनांची सूचना देण्यात येते. जेणेकरून घटनास्थळी जलदगतीने मदत पोहोचविणे सोयीचे होते. प्रवाशांना तातडीने मदत मिळण्याकरिता महामार्गावर हेल्पलाईन नंबरचे फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय, समृद्धी महामार्गावर घटना व्यवस्थापन ( Incident Management) सुरळीत होण्याच्या अनुषंगाने स्टॅण्डर्ड आपरेटिंग प्रोसिजर ( SOP) तयार केलेली असून त्याचप्रमाणे घटना व्यवस्थापन प्रतिसाद प्रणाली मार्फत कामकाज पाहिले जाते.

MGNREGA Name Changed : मनरेगाचे नाव केंद्र सरकार बदलणार; आता या नावाने ओळखली जाणार योजना

MGNREGA Name Changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MGNREGA Name Changed । देशातील सर्वात मोठी ग्रामीण रोजगार योजना असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाचे नाव बदलण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे नामकरण करणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली. आता हि योजना पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना म्हणून ओळखली जाईल. ग्रामीण रोजगार आणि विकासाला नवी दिशा देण्यासाठी हा बदल करण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, विधेयक संसदेत सादर केले जाईल. विधेयक मंजूर झाल्यानंतर हे बदल होतील.

मनरेगा अंतर्गत, ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्य कामाची मागणी करू शकतात. पंचायत स्तरावर रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तलाव बांधणी, रस्ते दुरुस्ती, नाले खोदणे, बागकाम, मातीकाम आणि इतर सामुदायिक काम असे काम वेगवेगळे असते. ही योजना ग्रामीण भागात रोजगार आणि उपजीविकेच्या सुरक्षेचा एक प्रमुख स्रोत आहे. ग्रामीण भागात महागाई आणि नोकऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन केंद्र सरकार कडून या कामाच्या दिवसांची संख्या १२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाच्या हाताला जास्तीचे काम मिळेल, त्यांचे उत्पन्न वाढेल आणि वाढत्या स्थलांतराला आळा बसेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे सांगण्यात आले. MGNREGA Name Changed

प्रियांका गांधींचा संताप – MGNREGA Name Changed

केंद्र सरकारने मनरेगाचे नामांतर केल्यानंतर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मनरेगा योजनेचे नाव बदलण्याच्या निर्णयामागील तर्क समजत नाही. सर्वप्रथम, हे महात्मा गांधींच्या नावावर आहे आणि जेव्हा ते बदलले जाते तेव्हा सरकारी संसाधने पुन्हा खर्च होतात. कार्यालयीन साहित्यापासून ते स्टेशनरीपर्यंत सर्व काही नाव बदलावे लागते, ज्यामुळे ती एक मोठी आणि महागडी प्रक्रिया बनते. मग हे करण्याचा काय अर्थ आहे? असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला.

Gold Rate Today : सोने 1174 रुपयांनी महागले; आजचे भाव इथे चेक करा

Gold Rate Today 13 dec

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate Today। भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भर हिवाळ्यात सोने खरेदीदार ग्राहकांना घाम फुटला आहे. आज १२ डिसेंबर २०२५ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 133643 रुपयावर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.89% म्हणजेच तब्बल 1174 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी मात्र 6342 रुपयांनी घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना थोडाफार का होईना पण दिलासा मिळाला आहे.

भारतातील सोन्याच्या किमतींवर (Gold Rate Today ) आंतरराष्ट्रीय स्पॉट सोन्याचे दर, अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार आणि सोन्यावरील आयात शुल्क यांसारख्या घटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो. तसेच राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात. मागील ५ वर्षात सोन्याच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. खास करून कोरोना काळानंतर सोने गगनाला भिडले. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोने खरेदी करणे जवळपास अशक्य गोष्ट झाली आहे. काहीजण आजकाल सोन्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा पाहतात.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Rate Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 122750 रुपये
मुंबई – 122750 रुपये
नागपूर – 122750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 131910 रूपये
मुंबई – 131910 रूपये
नागपूर – 131910 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.

Maharashtra Politics : अमित शहा फडणवीसांना चेकमेट करणार? म्हणूनच शिंदेंना ताकद देण्याची खेळी

Maharashtra Politics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Politics : अमित शाह याना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचा आहे. म्हणून ते एकनाथ शिंदेंना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहते. अमित शाह यांना देवेंद्र फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाही. त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही. म्हणून ते एकनाथ शिंदेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात असा मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या आजारी असलेल्या राऊतांनी आज खूप दिवसानंतर पत्रकार परिषद घेतली आणि सत्ताधाऱ्यांवर आपल्या खास शैलीत टीकेची झोड उठवली.

संजय राऊत म्हणाले, मिंध्यांचा पक्ष हा अमित शाहांचा पक्ष आहे. एकनाथ शिंदेची कुठेही ताकद नाही, ही भारतीय जनता पक्षाच्या मतानं त्यांना आलेली सूज आहे आणि पैसे यंत्रणा बाकी अमित शाहाचं इंजेक्शन टॉनिक आहे. एकनाथ शिंदेंची जर ताकद असती तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून एवढे अपमान होऊन ते अमित शाहांकडे रडत गेले नसते . आणि दुसरीकडे अमित शहांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचा आहे म्हणून ते एकनाथ शिंदेंना ताकद द्यायचा प्रयत्न करतात. Maharashtra Politics

वेगळ्या विदर्भावरुन भाजप- काँग्रेसवर घणाघात – Maharashtra Politics

दरम्यान, राज्यात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा वर आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत असल्याचे म्हंटल होते, त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही बावनकुळे यांच्या विधानाची री ओढली. यावरून संजय राऊतांनी भाजप आणि काँग्रेस दोघांनाही खडेबोल सुनावले. आम्ही वडेट्टीवार अथवा काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही. यापूर्वी सुद्धा या मुद्यावरून आमचा आणि काँग्रेसचा वाद झाला आहे. तर महाराष्ट्र अखंड राहावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांची सहमती आहे. काँग्रेसनं कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर मराठी माणसाच्या भूमिकेवर असं म्हणत संजय राऊतांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला तीव्र विरोध केला.

Pune Traffic : महत्वाची बातमी!! पुण्यातील हा रस्ता 9 दिवस वाहतुकीसाठी बंद

Pune Traffic

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Traffic । पुणे पुस्तक महोत्सव 2025 च्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाकडून रस्ते वाहतुकिसंदर्भात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय (एफ सी) रोड आजपासून ९ दिवस म्हणजेच २१ डिसेंबर पर्यंत बंद असणार आहे. अशावेळी एफ.सी रोडवरून न जाता, पर्यायी रस्ता मार्ग वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

फर्ग्युसन कॉलेज मैदानावर दि. 13 ते 21 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या भव्य पुस्तक महोत्सवासाठी दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, वाचक आणि साहित्यप्रेमींची उपस्थिती अपेक्षित आहे. या पुस्तक महोत्सवाला विद्यार्थी, व्हीव्हीआयपी, नागरिक मिळून ७ ते ८ लोक जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, साहजिकच यामुळे फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता तसेच आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे बदल लागू करण्यात आले आहेत. पुस्तक महोत्सव काळात सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर काही वेळा वाहतूक नियंत्रण व आवश्यकतेनुसार वाहने वळवण्याची तरतूद करण्यात आली आहे. Pune Traffic

5 महत्त्वाचे बदल- Pune Traffic

  1. जंगली महाराज रोडने कर्वे रोड करीता बालगंधर्व डावी कडे वळून, नदीपात्र रोडने, महादेव मंदीर येथून इच्छित स्थळी जावावे
  2. कर्वेरोड कडून एफ. सी. कॉलेज रोडने शिवाजीनगर च्या दिशेने जाण्याकरीता कर्वे रोड नळस्टॉप, लॉ कॉलेज रोडने, सेनापती बापट रोडने इच्छित स्थळी जावा
  3. पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरीकांसाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. 3 संत तुकाराम महाराज पादुका चौक येथून दुचाकी चारचाकी / बस इत्यादी वाहनांना एफ. सी. कॉलेज मधील पार्किंग ग्राऊंड करीता प्रवेश देण्यात येणार आहे.
  4. पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरिकांनी बाहेर जाण्याकरीता एफ. सी. कॉलेज गेट नं. 4 चा वापर करावा.
  5. पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरीकांनी फक्त पायी जाण्यासाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. 2 चा वापर करावा.

FIAचे अध्यक्ष म्हणून श्रीकांत अक्कापल्ली यांची निवड

Srikanth Akkapall

न्यूयॉर्क – १२ डिसेंबर २०२५ – ‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स ऑफ युएसए’ (एफआयए-एनवाय-एनजे-सीटी-एनई) ही १९७० मध्ये स्थापन झालेली आणि अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील आठ राज्यांतील भारतीय समुदायांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात मोठी, अग्रगण्य आणि तळागाळापर्यंत पोहोचलेली ना-नफा ना-तोटा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. वर्ष २०२६ साठी त्यांनी नुकतीच संस्थेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. स्वतंत्रपणे नियुक्त केलेल्या निवड आयोगाच्या (अलोक कुमार, जयेश पटेल आणि केनी देसाई) नेतृत्वाखाली वार्षिक अंतर्गत पुनरावलोकन व निवड प्रक्रिया देखील संस्थेने पूर्ण केली आहे. आयोगाच्या शिफारशींना संचालक मंडळाची संपूर्ण मंजुरी मिळाली असून नव्याने निश्चित झालेले २०२६ चे कार्यकारी मंडळ १ जानेवारी २०२६ रोजी पदभार स्वीकारणार आहे.


श्रीकांत अक्कापल्ली यांची सर्वानुमते २०२६ च्या कार्यकारी मंडळाचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली असून ते विद्यमान अध्यक्ष सौरिन पारिख यांची जागा घेतील. मागील टीममधील उपाध्यक्ष प्रीती रे पटेल आणि महासचिव सृष्टि कौल नरूला आपल्या वर्तमान पदांवर यापुढेही कार्यरत राहतील. यंदाच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून, निवड आयोग व ‘एफआयए’ मंडळाने कार्यकारी मंडळ अधिक सुसूत्रबद्ध केले असून संस्थेचा विस्तार केला आहे. शाह अकाउंटंट्स, ही स्वतंत्र सीपीए फर्म, संस्थेच्या खजिनदाराची भूमिका पार पाडेल. अक्कापल्ली हे एक प्रख्यात उद्योजक असून त्यांचे कार्यक्षेत्र रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, तंत्रज्ञान, मीडिया आणि अमेरिकेत व भारतात डायस्पोरा एंगेजमेंटपर्यंत पसरलेले आहे. त्यांच्या व्यावसायिक उपक्रमांमध्ये बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर विकास, ट्रान्झिट टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग, लाइफ सायन्सेस, आयटी आणि क्लाउड कम्प्यूटिंग, क्रीडा उपकरण उत्पादन, तसेच प्रीमियम फर्निचर डिझाइनचा समावेश होतो. अक्कापल्ली हे त्यांच्या, दूरदर्शी नेतृत्व आणि मजबूत ऑपरेशनल क्षमतेसाठी ओळखले जातात.


नव-निर्वाचीत अध्यक्ष म्हणून केलेल्या आपल्या भाषणात, अक्कापल्ली यांनी विश्वस्त मंडळाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांचा विश्वास मिळाल्याबद्दल “धन्यता आणि आनंद” व्यक्त केला. ‘एफआयए’ मध्ये स्वागत केल्याबद्दल आणि संस्थेच्या रुपाने “एक मोठे कुटुंब” मिळवून दिल्याबद्दल त्यांनी चेअरमन अंकुर वैद्य, तसेच संचालक मंडळ, विश्वस्त, सल्लागार सदस्य आणि कार्यकारी सहकाऱ्यांचेही आभार मानले. आपल्या मूळ राज्यातून या पदावर विराजमान होणारी पहिली व्यक्ती म्हणून या निवडीचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून, त्यांनी प्रामाणिकपणे आणि ध्येयाने सेवा करण्याचे आश्वासन दिले आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी, तिच्या प्रमुख उपक्रमांना अधिक बळकटी देण्यासाठी आणि सखोल समुदाय सहभाग वाढवणाऱ्या कार्यक्रमांना विकसित करण्यावर आपण भर देणार असल्याचे अक्कापल्ली यांनी यावेळी सांगितले.


वरिष्ठ नेते आणि दीर्घकाळापासून संस्थेशी निगडित सदस्यांनी त्यांच्या निवडीचे मनापासून स्वागत केले आहे. एका ज्येष्ठ सदस्याने, अक्कापल्ली यांचा प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, सचोटी आणि दीर्घकालीन निष्ठावंत बांधिलकी याचे कौतुक केले, तसेच त्यांची नियुक्ती ही ‘एफआयए’च्या नेतृत्वामधील वाढत्या प्रादेशिक विविधतेचे प्रतिबिंब असलेली ऐतिहासिक घटना व भविष्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड असल्याचे म्हटले. शंभर टक्के स्वयंसेवकांच्या कामाद्वारे चालवली जाणारी आणि पाच दशकांहून अधिक काळ सेवेत असलेली ‘एफआयए’ ही, अमेरिकेच्या काँग्रेशनल रेकॉर्डमध्ये अधिकृत मान्यता प्राप्त करणारी, भारताचा प्रतिष्ठित ‘प्रवासी भारतीय सम्मान’ पुरस्कार मिळवणारी आणि दोन गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असलेली संस्था आहे.

Census 2027 : देशभरात 2 टप्प्यात जनगणना होणार; 11718 कोटींचे बजेट मंजूर

Census 2027

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Census 2027 । केंद्रातील मोदी सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत तीन महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. यामध्ये केंद्र सरकारने जनगणनेसाठी 11718 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली.  केंद्र सरकारनं 16 जून 2025 ला जनगणनेचं राजपत्र जाहीर करण्यात आलं होतं. हि जनगणना एकूण २ टप्प्यात केली जाईल. तसेच कोळसा जोडणी धोरणात सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोळसा सेतू धोरणालाही मान्यता दिली. 2025 च्या हंगामासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लाही सरकारने धोरणात्मक मान्यता दिली आहे.

पहिली डिजिटल जनगणना – Census 2027

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२७ च्या जनगणनेसाठी ११,७१८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. २०२७ ची जनगणना दोन टप्प्यात केली जाईल, ज्या अंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान घरांची यादी केली जाईल आणि फेब्रुवारी २०२७ मध्ये जनगणना केली जाईल. २०२७ मध्ये होणारी जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना असेल. डेटा सुरक्षितता लक्षात घेऊन जनगणनेची डिजिटल रचना तयार करण्यात आली आहे. २०२७ च्या जनगणनेत जातीवर (Census 2027) आधारित जनगणनेचा सुद्धा समावेश असेल. २०२७ ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असेल असे अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल.

याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२६ साठी दळलेल्या खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल १२,०२७ रुपये आणि गोल खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल १२,५०० रुपये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मंजूर केली आहे. यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ हे नोडल एजन्सी असतील. सरकारने खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल ४४५ रुपये एमएसपी वाढवली असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Red Chequered Highway : लाल पट्ट्यांचा महामार्ग; काय आहे यामागील आयडियाची कल्पना ?

Red Chequered Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Red Chequered Highway । मित्रानो, रस्त्यावर प्रवास करत असताना तुम्ही त्यावर पांढरी किंवा पिवळी [पट्टी बघितली असेलच. मात्र आता लाल रंगाने रस्त्यावर निर्देशक आखण्यात आले प्रवाशांमध्ये याबाबत कुतूहल निर्माण झालं आहे. हा लाल पट्ट्यांचा महामार्ग मध्य प्रदेशात उभारण्यात आला आहे. जबलपूर आणि भोपाळ राष्ट्रीय महामार्ग! क्रमांक 45 वर तुम्हाला असे लाल पॅचेस असणारा महामार्ग पाहायला मिळेल. सरकारने प्रथमच असा लाल पट्ट्यांचा महामार्ग का बांधला आहे? यामागे नेमकं कारण काय आहे? हे आपण आज जाणून घेऊया.

वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन- Red Chequered Highway

तर हा लाल चौकोनी पॅचेस असलेला महामार्ग भोपाळ आणि जबलपूर दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग ४५ चा ११.९६ किमी लांबीचा हिरण-सिंदूर विभाग नौरादेही वन्यजीव अभयारण्य आणि वीरंगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जातो. हा महामार्ग थेट जंगलातून जातो, त्यामुळे त्याठिकाणच्या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. जेणेकरून प्राण्यांना त्यांच्या अधिवासात कमीत कमी अडथळा येता येईल आणि रस्त्याखाली सुरक्षितपणे फिरता येईल. अहवालांनुसार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावर २५ अंडरपास बांधले आहेत .Red Chequered Highway

मध्य प्रदेशातून जाताना हा महामार्ग वीरंगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जातो. तो नौरादेही वन्यजीव अभयारण्यातूनही जातो. कोल्हे आणि हरीण यांसारखे प्राणी पूर्वी अनेकदा या वर्दळीच्या रस्त्यावरून जाताना दिसायचे. अशावेळी भरधाव गाडी थेट प्राण्यांना टक्कर देऊ नये यासाठी हि आयडियाची कल्पना करण्यात आली आहे. रस्त्यावरील लाल रंगाचे टेबलटॉप मार्किंग वाहनचालकांना इशारा देतात की ते वन्यजीवांच्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत, त्यामुळे गाडीचा वेग हा कमी करावा. महत्वाची गोष्ट म्हणजे हा लाल रंगाच्या रंगीत पट्ट्या पाच मिलीमीटर जाडीच्या आहेत. आणि थोड्या उंचावर आहेत, ज्यामुळे चालकांना त्यावरून गाडी चालवताना थोडासा धक्का जाणवतो आणि गाडीचे स्पीड कमी करण्यास ते चालकांना प्रवृत्त करतो. अधिकृत प्रकल्प अहवालात असेही नमूद केले आहे की आजूबाजूच्या वन्यजीव क्षेत्रांचे पुनर्वर्गीकरण केल्यानंतर अपग्रेड केलेल्या महामार्गामुळे पर्यटन आणि महसूल वाढेल अशी अपेक्षा आहे

Eknath Shinde : मुंबईतील मुस्लिमबहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपच्या सर्व्हेत मोठी माहिती

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Eknath Shinde। हिंदुत्वासाठी आम्ही महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत सत्तेत गेलो असं विधान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली केलं होतं. मात्र आता भाजपच्याच एका सर्व्हेत अशी माहिती समोर आली आहे कि मुंबईतील ७० टक्के मुस्लिमबहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती मिळत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपच्या ऐवजी या भागात एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट मिळू शकते असं बोलले जात आहे,. एकीकडे भाजप प्रखर हिंदुत्वाचा प्रचार करत असताना अशावेळी मुस्लिमबहुल भागात महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी भाजप एकनाथ शिंदेंना फ्री हॅन्ड देऊ शकते.

काय सांगतो भाजपचा सर्वे ?

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर आली आहे. राज्यात आणि केंद्रात एकहाती वर्चस्व असताना आता मुंबई महापालिका या देशातील सर्वात श्रीमंत महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग सुरु आहे. ठिकठिकाणी सर्वे करून लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललाय. भाजपसमोर मुंबई सर्वात मोठी अडचण ठरू शकतो तो म्हणजे मुस्लिम मतदार, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हाच मुस्लिम मतदार काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला होता. अशावेळी भाजपने मुस्लिम बहुल भागात सर्व्ह करून नेमका अंदाज घेतला असल्याचं बोललं जातंय.

मुस्लिमबहुल भागात भाजपपेक्षा शिंदेंचा करिष्मा – Eknath Shinde

भाजपाच्या या सर्व्हेत मुंबईतील 18 वॉर्डमध्ये 70 टक्के मुस्लिम बहुल भागात भाजपला विरोध होत असला तरी एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती असल्याचे दिसून आले. या 18 वॉर्डात भाजप उमेदवारापेक्षा शिंदे गटाच्या नेत्यांना तिकीट दिले तर महायुतीला जास्त फायदा होईल. कारण एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा मुस्लिम महिलांनाही मिळत असल्याने शिंदेंबद्दल महिलांच्या मनात चांगल्या भावना आहेत. त्यामुळे या मुस्लिमबहुल भागात शिंदेंचा प्रभाव भाजपपेक्षा जास्त दिसतोय. Eknath Shinde

दरम्यान, या सर्व्हेबाबत एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं कि, सध्या जागांबाबत काही चर्चा नाही. आम्ही ज्या योजना आणल्या त्यात कुठेही भेदभाव केला नाही. सर्वसमावेशक अशा योजना आम्ही राबवल्या. विकास करतानाही काही फरक केला नाही. लोकाभिमुख कल्याणकारी लाडकी बहीण योजना आणतानाही आम्ही कुठेही भेदभाव केला नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

Gold Price Today : सोने महागले, चांदी स्वस्त झाली; आजचे भाव इथे चेक करा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Price Today । भारतीय सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्याची किंमत वाढली आहे, तर दुसरीकडे चांदी मात्र स्वस्त झाली आहे. आज १२ डिसेंबर २०२५ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 132442 रुपयांवर उघडला. परंतु सुरुवातीपासूनच सोन्याची किमतीत तेजी पाहायला मिळाली. आत्ता सोने 132761 रुपयांवर व्यवहार करत असून या किमतीत 0.22% म्हणजे 292 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 439 रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदी 198503 रुपयांवर व्यवहार करत आहे.

भारतातील सोन्याच्या किमतींवर (Gold Price Today ) आंतरराष्ट्रीय स्पॉट सोन्याचे दर, अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार आणि सोन्यावरील आयात शुल्क यांसारख्या घटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो. तसेच राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात. मागील ५ वर्षात सोन्याच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. खास करून कोरोना काळानंतर सोने गगनाला भिडले. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोने खरेदी करणे जवळपास अशक्य गोष्ट झाली आहे. काहीजण आजकाल सोन्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा पाहतात.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 121600 रुपये
मुंबई – 121600 रुपये
नागपूर – 121600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 130200 रूपये
मुंबई – 130200 रूपये
नागपूर – 130200 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.