गोव्याहून मुंबईला निघालेल्या ट्रॅव्हलचा कोल्हापूरात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत झालेले आहे. कारण दररोज कोणत्या ना कोणत्या भागातून रस्ते अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता देखील अशीच एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आज गोव्याहून मुंबईला जाणारी ट्रॅव्हल कोल्हापूरात उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघात झालेल्या ट्रॅव्हलमध्ये तब्बल 25 जण प्रवास करीत होते. त्यामुळे सध्या या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स व्हीआरएल कंपनीची होती. या ट्रॅव्हल्समध्ये एकूण 25 प्रवासी होते. ही ट्रॅव्हल्स गोव्याहून मुंबईला निघाली होती. परंतु, कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड पुईखडी येथील भागात वळण घेत असतानाच ट्रॅव्हल्स पलटी झाली. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप ट्रॅव्हलमधून बाहेर काढले.

तिघांचा दुदैवी मृत्यू

परंतु या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. महत्त्वाचे म्हणजे हे तिघेजण देखील एकाच कुटुंबातील सदस्य होते. नीलू गौतम, (वय 43), रिधिमा गौतम, (वय 17), सार्थक गौतम अशी भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे सर्वजण पुण्यातील रहिवासी होते. या घटनेमुळे गौतम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.