पावसाळ्यानंतर औरंगाबादेतील 39 रस्ते डांबरीकरण करण्याचा प्रशासनाचा निर्णय

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | औरंगाबाद येथील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्यामूळे अपघाताचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. आता महापालिका प्रशासनाने रस्ता डांबरीकरणाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेतर्फे पावसाळ्यानंतर शहरातील विविध भागातून जाणारे 39 रस्ते डांबरीकरण केली जाणार आहे. याबाबत आठ ते दहा दिवसांमध्ये निविदा मागविण्यात येणार असून या कामाची किंमत 57 कोटी रुपये असणार आहे. आणि राज्य सरकारने महापालिका तीन महापालिकेला तीन टप्प्यात निधी मंजूर केला होता. यामध्ये 24 कोटी रुपये 100 कोटी रुपये आणि टप्प्याटप्प्याने 152 कोटी रुपये जाहीर केले होते. परंतु अजूनही बऱ्याच रस्त्यांचे काम रखडले आहे. यामुळे महापालिका प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी रस्त्यांसाठी 100 कोटींची तरतूद केली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 57 कोटी रुपयांचे रस्त्याचे कामे केली जाणार आहे.

‘57 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या विकासासाठी निविदा देण्याची फाइल मंजुरीसाठी पाठवली आहे. 8-10 दिवसात निविदा मिळेल, आणि संपूर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर रस्ता बांधणी सुरू केली जाईल. त्याचबरोबर 39 रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पावसाळ्यानंतर सुरू केले जाणार आहे.’ असे शहर अभियंता एस.डी. पानझाडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here