भिवंडीत अगरबत्ती, कापूरच्या कारखान्यास भीषण आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत येथे कापूर, अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग लागली आहे. भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या गोदाम पट्यातील लक्ष्मी कंपाऊंड भागात आज सकाळच्या साडे सहा वाजल्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, भिवंडी येथे आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अगरबत्ती कारखान्यातून अचानकपणे धुरांचे लॉट बाहेर येताना परिसरातील नागरिकांना दिसले. यावेळी नागरिकांनी त्याठिकाणी जाऊन पाहताच त्यांना कारखान्यास आग लागल्याचे दिसून आले. यावेळी नागरिकांनी तत्काळ भिवंडी, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कर्मचारी 5 ते 6 बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे.

या भीषण आगीत कापूर, अगरबत्तीचे तळ अधिक एक मजली असलेले गोदामसह कंपनी आगीत पूर्णपणे जळाळी आहे. तसेच त्याचे धुराचे लोट परिसरात पसरले आहेत. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.