अरे वा !! महाराष्ट्रात स्थापन होणार AI विद्यापीठ; विकासाला नवा मार्ग मिळणार

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Ai) क्षेत्रातील संशोधन व विकासासाठी महाराष्ट्रात एक अत्याधुनिक एआय विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. हे विद्यापीठ एआय, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, डेटा सायन्स व इतर संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये संशोधन आणि शिक्षण प्रदान करणारे महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. नव्या युगातील तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एआय विद्यापीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. तर चला या बातमी बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Ai विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट –

Ai विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे एआय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, नॉलेज ग्राफ्स, सेमेटिक मॉडेल्स आणि होरिजंटल व वर्टिकल एआय यासारख्या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देणे. एआयचा उपयोग कृषी, अर्बन प्लॅनिंग, सामाजिक क्षेत्र, वित्त, आणि शिक्षणात क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतो. यासाठीच विद्यापीठात Ai आणि मशीन लर्निंगसाठी एक प्रमाणित अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे , जो भविष्यातील तज्ज्ञ तयार करेल. तसेच पारंपरिक संशोधक आणि एआय तज्ज्ञ यांच्यात इंटरडिसिप्लिनरी सहकार्य वाढवून नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना मिळेल. या विद्यापीठामध्ये लोकांना एआयच्या नैतिक आणि शाश्वत वापराचे शिक्षण मिळेल आणि भारतीय पद्धतीचे एआय विकासाला प्रोत्साहन दिले जाईल.

विविध क्षेत्रात मोठ्या सुधारणा –

एआयच्या सहाय्याने कृषी, सामाजिक, वित्तीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होऊ शकतात. पीक उत्पादन वाढवण्यासाठी, स्वयंचलित कृषी उपकरणे आणि हवामान अनुमान वापरणे शक्य होईल. स्मार्ट सिटींच्या विकासात वाहतूक व्यवस्थापन, शहरी पायाभूत सुविधा आणि ऊर्जेचा कार्यक्षम वापर साधता येईल. आरोग्य, सामाजिक कार्य आणि आपत्ती प्रतिसादासाठी अधिक प्रभावी यंत्रणा तयार होईल. वित्तीय क्षेत्रात एआय आर्थिक फसवणुकीचा शोध, अल्गोरिदमिक ट्रेडिंग आणि खासगी आर्थिक नियोजन सुलभ करेल. शिक्षणात एआय ट्युटर्सद्वारे व्यक्तिमत्वानुसार अनुभव दिला जाईल, तसेच नोकरीच्या संधी वाढवून बेरोजगारी कमी होईल. एआय आधारित निदान व उपचार पद्धतींमुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावी होईल. त्यामुळे एआय विद्यापीठाच्या माध्यमातून भारतात उच्च दर्जाचे, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व संशोधन प्राप्त होईल, आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल.