Amrut Bharat Station Scheme : भारतीय रेल्वेने देशातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद व सुसज्ज करण्यासाठी मोठा पाऊल उचलले आहे. भारत सरकारने ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे रुपांतर सुरू केले असून याअंतर्गत प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधांचा अनुभव मिळणार आहे.
१०३ अमृत स्टेशनांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते
या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात १०३ अमृत भारत स्टेशन्सचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे सर्व स्थानक अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक रचना आणि प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या सुविधांनी सज्ज केले गेले आहेत. देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे स्टेशन लवकरच सर्वांसाठी खुले होतील.
स्थानकांची थीम
या नव्या स्टेशन डिझाइन्समध्ये भारतीय कला, सांस्कृतिक वारसा तसेच वन्यजीवनाचा प्रभाव दिसून येतो. प्रत्येक स्टेशनची थीम विशिष्ट ठेवण्यात आली असून ती त्या भागाच्या स्थानिक ओळखीशी जुळणारी आहे. त्यामुळे स्टेशनवर प्रवेश करताच प्रवाशांना एका आगळ्या विश्वात प्रवेश केल्यासारखे वाटते.
प्रवाशांसाठी उपलब्ध असणाऱ्या प्रमुख सुविधा
फ्री वाय-फाय सेवा
सुसज्ज एसी वेटिंग रूम्स
स्वच्छ आणि आधुनिक शौचालयं
स्पष्ट दिशादर्शक फलक आणि साईनबोर्ड्स
आकर्षक प्रवेशद्वार व निर्गमन मार्ग
फूड कोर्ट, किओस्क आणि प्लाझा एरिया
बच्च्यांसाठी खेळण्याचे मैदान
प्रेक्षणीय लँडस्केपिंग आणि सजावट
या योजनेमुळे रेल्वे स्टेशन हे केवळ प्रवासाचे ठिकाण न राहता एक सांस्कृतिक आणि सुविधायुक्त केंद्र बनणार आहे. ‘अमृत भारत स्टेशन योजना’मुळे भारतीय रेल्वे नव्या युगात प्रवेश करत आहे आणि प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आनंददायी अनुभव मिळणार आहे.