फेसबुकवरच्या प्रेमाने केल्या सर्व सीमा पार; प्रियकरासाठी भारतीय महिलेने थेट पाकिस्तान गाठलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या प्रियकरांसाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण सध्या देशभर चांगलच चर्चेत आल आहेत. हे प्रकरण ताज असतानाच आत भारतातील एक महिला आपल्या प्रियकराला भेटायला पाकिस्तानात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या महिलेला दोन मुले असून तिची ओळख फेसबुकच्या माध्यमातून प्रियकरासोबत झाली होती. प्रियकराच्या प्रेमात ती इतकी बुडाली की तिने कशाचाही विचार न करता थेट पाकिस्तान गाठलं आहे.

संबंधित महिला राजस्थान येथील भिवडी जिल्ह्यातील रहिवासी आहे. अंजू असे तिचे नाव असून तिच्या पाकिस्तानमधील प्रियकराचे नाव नसरुल्ला आहे . तर महिलेच्या पतीचे नाव अरविंद असे आहे. रविवारी अंजू जयपूरला जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर थेट पाकिस्तानमध्ये असल्याची माहिती तिच्या पतीला प्रसार माध्यमांच्याद्वारे समजली. मुख्य म्हणजे, आपल्या पत्नीचे अफेअर चालू असल्याची माहिती पती अरविंदला पूर्वीपासूनच होती.

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या नसरुल्ला आणि अंजूची ओळख काही वर्षांपूर्वी फेसबुक माध्यमातून झाली होती. यानंतर या दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पुढे जाऊन या दोघांमध्ये एकमेकांना भेटायची ओढ वाढली. त्यामुळे पाकिस्तानला जाण्यासाठी अंजूने पाऊल उचलले. आता अंजूकडे पाकिस्तानचा व्हिजा असल्यामुळे तिच्यावर कोणतेही कारवाई करण्यात आलेले नाही. सध्या ती मलाकंद जिल्ह्यात आहे. सुरक्षा रक्षकांकडून तिचा सर्व तपास सुरू आहे. अंजूने परदेशात नोकरी मिळवण्याचे खोटे सांगत 2020 मध्येच पासपोर्ट बनवला होता. खास म्हणजे, अरविंदबरोबर लग्न करण्यासाठी तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून अरविंद पासून तीला दोन मुले आहेत. नसरुल्ला आणि अंजूचे प्रेम प्रकरण अरविंदला माहित असताना देखील आपली पत्नी पुन्हा येईल अशी अरविंद आहे.

दरम्यान अंजू सीमा हैदरसारखी अवैध मार्गे पाकिस्तानमध्ये शिरली नव्हती. त्यामुळे, तिच्यावर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही. तसेच तिच्याकडे अधिकृत विजा, पासवर्ड असल्यामुळे तिला सहजरीत्या पाकिस्तानमध्ये जाता आले. आता अंजूची सर्व चौकशी केल्यानंतर तिला सुरक्षितपणे भारतात परत पाठवण्यात येईल.