अजितदादांना अडकविण्यासाठी शरद पवारांचा डाव; मराठा आंदोलनावरून देशमुखांचा मोठा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला असून जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर संपूर्ण राज्यात वातावरण चिघळलं आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकेमेकांवर टीका करत असताना भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी वेगळीच शंका निर्माण केली आहे. मराठा समाजाला घेऊन अजित पवार (Ajit Pawar)  यांना अडचणीत अडकवून पुन्हा आपल्या पक्षात परत आणण्याचा डाव शरद पवार (Sharad Pawar)  यांचा आहे, असा आरोप देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रालयावर आरोप केल्यानंतर आशिष देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावरून शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. शरद पवारांनी मराठा आरक्षण आंदोलनचा स्वतःच्या राजकीय हितासाठी वापर करत आहेत. मराठा समाजाला सोबत घेऊन अजित पवारांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव आहे असं आशिष देशमुख यांनी म्हंटल.

अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करा –

आशिष देशमुख पुढे म्हणाले कि, शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अनिल देशमुख यांनी गृहमंत्रालयावर लाठीचार्ज केल्याचा आरोप केला होता. अनिल देशमुख गृहमंत्री नसल्यामुळे त्यांना गृहमंत्रालयाबाबत सर्व काही कळू लागले आहे. मात्र गृहमंत्री असताना त्यांना काही माहिती मिळाली नाही का? गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांना स्फोटके कोणी आणले, सचिन वाझे हा वसुली करतो हे माहित नव्हतं का? असा सवाल आशिष देशमुख यांनी केला. तसेच हे सर्व शरद पवारच करत आहेत त्यामुळे अनिल देशमुख यांची ‘नार्को टेस्ट’ करा, सत्य समोर येईल, अशी मागणीही आशिष देशमुख यांनी केली.