औरंगाबादमध्ये सैराट!! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्याची भर रस्त्यात हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सैराट चित्रपटात ज्याप्रकारे शेवट दाखवला आहे तशीच घटना औरंगाबाद मध्ये घडली आहे. बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याच्या रागातून 3 वर्षानंतर एकाने बहिणीच्या पतीची भररस्त्यात हत्या (Murder)केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हत्येनंतर सदर आरोपीने रस्त्यातच जल्लोषही केल्याचे समजत आहे.

ही घटना औरंगाबाद पुणे महामार्गावरील इसारवाडी फाट्यावरील दहेगाव बंगल्याजवळ घडली. बापू खिल्लारे (वय 30 वर्षे) असे मृत युवकाचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी बापू याने आरोपीच्या बहिणीला पळवून नेऊन विवाह केला होता. याचा राग मनात धरून आरोपी भावाने आपल्या बहिणीच्या पतीची भररस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली आहे. हा हत्येनंतर आरोपीने अंगावरील शर्ट हवेत गोल फिरवत जल्लोष केला आणि तिथून तो फरार झाला.

या खळबळजनक घटनेनंतर वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. तसेच बापू खिल्लारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.