Baluchistan Independence : पाकिस्तानचे 2 तुकडे, बलुचिस्तान स्वतंत्र झाला? भारताकडे केली ‘ही’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Baluchistan Independence : भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असताना, एक ऐतिहासिक आणि धक्कादायक घोषणा समोर आली आहे. बलुचिस्तानने स्वतंत्रतेची घोषणा केली आहे. हे केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी राजकीय भूकंपासारखं आहे. बलुच लेखक आणि स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक स्फोटक पोस्ट करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा केली आहे. त्यांच्या मते, पाकिस्तानचा अंत आता समीप आहे आणि ही योग्य वेळ आहे बलुच राष्ट्रासाठी स्वतःचा झेंडा फडकवण्याची.

दिल्लीतील बलुच दूतावासाची मागणी

मीर यार बलोच यांनी थेट भारत सरकारकडे मागणी केली आहे की, दिल्लीमध्ये बलुचिस्तानचा (Baluchistan Independence) अधिकृत दूतावास उघडण्याची परवानगी द्यावी. “भारत आमचा नैसर्गिक मित्र आहे. पाकिस्तानने आमच्यावर अन्याय आणि अत्याचार केले आहेत. दिल्लीमध्ये आम्हाला आमचं प्रतिनिधित्व हवं आहे,” असं ते म्हणाले.

To the people of Balochistan: The time has come to claim your freedom. As we bring an end to Pakistan, rise up, strike, and take what is rightfully yours.

— Shesh Paul Vaid (@spvaid) May 8, 2025

संयुक्त राष्ट्रांकडे शांतता अभियान आणि आंतरराष्ट्रीय मान्यतेची मागणी

या घोषणेनंतर बलुचिस्तानकडून संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात खालील मागण्या ठेवण्यात आल्या आहेत:

बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाला मान्यता देण्यात यावी
UN Peacekeeping Force तात्काळ बलुचिस्तानमध्ये पाठवण्यात यावी
पाकिस्तानने ताब्यात घेतलेले प्रादेशिक, हवाई आणि समुद्रसीमा क्षेत्र रिकामं करावं
बलुचिस्तानसाठी स्वतंत्र चलन आणि पासपोर्ट छपाईसाठी अर्थसाहाय्य द्यावं
संक्रमणकालीन सरकार स्थापनेसाठी मदत मिळावी

पाकिस्तानी यंत्रणेला अंतिम इशारा (Baluchistan Independence)

मीर यार बलोच यांनी स्पष्ट इशारा दिला की, सेना, पोलीस, एफसी, आयएसआय, आणि नागरी अधिकारी जे बलुच नाहीत, त्यांनी बलुचिस्तान त्वरित सोडावे.“आम्ही शांती, स्वातंत्र्य आणि लोकशाही घेऊन येतो. आता हे युग पाकिस्तानच्या अन्यायाचं नाही,” असं त्यांचं ठाम मत.

भारत-पाक संघर्षाचा परिणाम

भारताने नुकतेच पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल ड्रोन स्ट्राईक्स करत जगासमोर स्पष्ट संदेश दिला आहे. आतंकवादाला आश्रय देणाऱ्यांना माफ नाही.या पार्श्वभूमीवरच बलुचिस्तानने ही घोषणा केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात एक नवीन आणि निर्णायक टप्पा सुरू झाला आहे.

गुरुवारी रात्री पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न फसला

रात्री 8 ते 10 या दरम्यान, पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, फिरोजपूर, कपूरथळा, जालंधर, आणि जैसलमेर येथील भारतीय लष्करी तळांवर ड्रोन, फायटर जेट्स, आणि रॉकेट्स वापरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराने सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवले.

पाकिस्तानला मोठा झटका

पाकिस्तानला आता इकडे आड तिकडे विहीर – भारतासोबत लष्करी संघर्ष आणि देशांतर्गत विघटन
भारताच्या कारवायांनी बलुचिस्तानच्या चळवळीला नवा आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवून दिला आहे
बलुचिस्तान जर खरंच संयुक्त राष्ट्र आणि भारताच्या मान्यतेसह स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आलं, तर पाकिस्तानचं राजकीय विघटन अनिवार्य ठरेल